शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

दुर्घटना घडल्यानंतरचे शहाणपण काय कामाचे?

By admin | Published: June 29, 2015 6:33 AM

मालाड मालवणी येथे विषारी दारू पिल्याने शंभरहून अधिक लोकांचा बळी गेला. त्यानंतर राज्यभर पोलिसांची धावपळ उडाली. ठिकठिकाणच्या दारूभट्ट्या उद््ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

संजय मानेमालाड मालवणी येथे विषारी दारू पिल्याने शंभरहून अधिक लोकांचा बळी गेला. त्यानंतर राज्यभर पोलिसांची धावपळ उडाली. ठिकठिकाणच्या दारूभट्ट्या उद््ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. पिंपरी-चिंचवडमधील पोलीसही त्यास अपवाद ठरले नाहीत. दुर्घटना घडल्यानंतर कारवाई, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यापेक्षा अगोदरच पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून अशा जीवघेण्या हातभट्ट्या उभ्या राहणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. दुर्घटना घडल्यानंतर उशिरा सुचणारे शहाणपण काय कामाचे, असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. दारूनिर्मितीसाठी आवश्यक रसायनसाठा असलेल्या ठिकाणी निराधारनगरमध्ये दोन वर्षांपूर्वी ठिणगी पडून आग लागली. झोपड्या आगीत खाक झाल्या. तेथील महिला, रहिवासी भाजले. दारूसाठ्याच्या ठिकाणी छापा टाकण्यास गेलेले उत्पादन शुल्क विभागाचे दोन कर्मचारीसुद्धा आगीत भाजून मृत्युमुखी पडले. एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर अशा बेकायदा दारूभट्ट्या, हातभट्टी दारूनिर्मितीचे अड्डे पिंपरी-चिंचवडमधून तेव्हाच हद्दपार होणे आवश्यक होते. मालवणी अथवा राज्यात अन्य ठिकाणी विषारी दारू दुर्घटना घडावी, नंतर कारवाईची पावले उचलावीत, अशी येथील पोलिसांना प्रतीक्षा करण्याची काही गरज नव्हती. मालवणीतील दुर्घटनेनंतर विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई केली. संबंधितांवर गुन्हे दाखल केले. मुद्देमाल जप्त केला. परंतु, त्या ठिकाणी पुन्हा काही दिवसांतच दारूभट्ट्या सुरू होतील. आणखी कोठे तरी दुर्घटना घडून येईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले जाईल, हे सर्वांना ज्ञात झाले आहे. विषारी दारूने अनेकांचा बळी जातो. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर संसार उघड्यावर पडतात. केवळ विषारी दारूच्या दुर्घटनाच नव्हे, तर असे अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्यातही अनेकांचे बळी जात आहेत. संसार उद्ध्वस्त होत आहेत. ते रोखण्याची जबाबदारी पोलिसांची नाही का? असा मुद्दा या अनुषंगाने उपस्थित झाला आहे. मटका, जुगाराच्या अड्ड्यांवर खुनी हल्ल्याच्या घटना घडतात. अनेकदा खूनही पडतात. अनेक जण जुगारात हरतात. संसाराची वाताहात होते . समाजहिताला बाधा आणणारे हे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणेला कशाची प्रतीक्षा आहे? असे प्रकार सुरू असल्याची माहिती बाळगणारे, अवैध धंदे बंद करा, अशी मागणी करणारे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते यांच्या नावाच्या याद्या मटकेवाल्यांकडे जमा होतात. त्यांना वेळचेवेळी हप्ते मिळतात. कोणी आवाज उठवीत नाही, कोणाची तक्रार नाही, म्हणून पोलीससुद्धा काही करीत नाहीत. -