शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती या रेल्वे गाड्यांचे डबे कधी वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 17:32 IST

- डब्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना धक्के खात करावा लागतो प्रवास

पुणे : पुणे-मुंबईदरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे; परंतु सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती या प्रमुख गाड्यांच्या डब्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई येथील प्लॅटफॉर्म नंबर १० आणि ११ चे विस्तारीकरण करण्यात आले. यामुळे पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती या गाड्यांचे डबे वाढविण्यात येणार होते; परंतु काम पूर्ण होऊनही डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय मात्र अजून झाला नाही. त्यामुळे प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे.

पुणे-मुंबईदरम्यान दररोज हजारोंच्या संख्येने चाकरमानी ये-जा करतात; परंतु सध्या या मार्गावर धावणाऱ्या प्रमुख गाड्यांना १६ डबे आहेत. तुलनेत प्रवासी संख्या मात्र जास्त आहे. त्यामुळे जागा अपुरी पडत आहे. परिणामी वादाचे प्रसंग घडत आहेत. या प्रमुख गाड्यांच्या डब्यांची संख्या २४ करणे गरजेचे आहे. वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मुंबईतील फलाटांचे विस्तारीकरण करण्यात आले. त्यामुळे या प्रमुख गाड्यांच्या डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला; परंतु त्याची अंमलबजावणी अजून झाली नाही. त्यामुळे प्रवाशांना आहे त्या गाड्यांमध्ये धक्के खात प्रवास करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

वादावादीचे प्रसंग टाळतील...

सकाळच्या सत्रात नोकरी व कामानिमित्त दैनंदिन ये-जा करणारे प्रवासी पास काढून प्रवास करतात. त्यामुळे त्यांची जागा राखीव असते; परंतु या डब्यांमध्ये एकादा नवीन प्रवासी बसला आणि पासधारक आले तर जागेवरून उठावे लागते. अशा वेळी वादावादी होतात. काही वेळा सिंहगड एक्स्प्रेसमध्ये हाणामारीदेखील झाली आहे. रेल्वेला कायम गर्दी असते. त्यामुळे वादावादीचे प्रसंग टाळायचे असतील, तर प्रशासनाला रेल्वे गाड्यांचे डबे वाढविणे गरजेचे आहे.

रेल्वे प्रशासन म्हणते...सध्या पुण्यातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जनरल डबे वाढविण्यात येत आहेत. झेलम एक्स्प्रेस व इतर दोन-तीन प्रमुख गाड्यांचे डबे बदलून वाढविण्यात आले आहे, तसेच एलएचबी कोच लावण्यात येत आहे. पुढील काही महिन्यांत पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या गाड्यांचे डबेदेखील क्रमशः वाढविण्यात येतील.

एसटी आणि ट्रॅव्हल्सचे तिकीट दर जास्त आहे. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रमुख गाड्यांचे डबे १६ वरून २४ करावेत, अशी आमची मागणी आहे; परंतु रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. - हर्षा शहा

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी