शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

माझ्या मुलांना गोष्ट सांगताना सुचलं ‘एकदा काय झालं...’, चित्रपटाबाबत सलिल कुलकर्णींच्या भावना

By श्रीकिशन काळे | Updated: August 24, 2023 20:58 IST

संगीतकार सलिल कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं...’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार

पुणे: ‘‘मी माझ्या मुलांना गोष्टी सांगता सांगता सुचलेला हा चित्रपट आहे. मुलांना गोष्टी सांगताना त्यातून खूप नाजूक संदेश देता येतो. ‘एकदा काय झालं...’ या चित्रपटाचे श्रेय माझ्या मुलांना आहे. त्यांना गोष्टी सांगताना हा चित्रपट तयार होऊ शकला आणि आपण कोणत्याही गोष्टीची सुरवात ‘एकदा काय झालं...’ असंच करतो. त्यामुळेच चित्रपटाचे नावच ते दिले. याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्याचा खूप आनंद होत आहे,’’ अशा भावना संगीतकार, लेखक, दिग्दर्शक सलिल कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.

राष्ट्रीय पुरस्कारांची गुरूवारी (दि.२४) घोषणा करण्यात आली. त्यामध्ये ‘एकदा काय झालं...’याला सर्वात्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संगीत देणारे सलिल कुलकर्णी यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.

कुलकर्णी म्हणाले,‘‘मी चित्रपटाची पटकथा लिहून झाल्यावर मुख्य भूमिकेसाठी पहिला चॉइस सुमीत राघवन हाच होता. कारण मुळात मुलांशी बोलताना तितका प्रेमाने बोलणारा कलाकार हवा होता. मोठ्यांशी खोटं बोलता येत नाही. कारण मुलांना ते लगेच समजते. सुमीत हा अतिशय जीवंत आणि प्रेमळ आहे. तो मला चित्रपटासाठी हवा होता आणि मिळाला.’’

चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, संगीत असं सर्व बाजू कशा सांभाळल्या याविषयी ते म्हणाले,‘‘ मी जेव्हा लेखक असतो, तेव्हा लेखनावर लक्ष असते. लेखन संपल्यावर गाणी लिहिताना गाण्यावर लक्ष केंद्रीत केले. मग शूट करताना कोणी तरी गाणी लिहिली आहेत, ते आपल्याला शूट करायची आहे, असं मनात होतं. मी चित्रपटात कुठेही अनावश्यक गाणं लिहिली नाहीत. संदीप खरे यांनेही गाणं लिहिली आहेत. गाणं सुरू झाल्यावर लोकांनी व्हॉट्सॲप पाहता कामा नये. ते पाहूनच गाणी लिहिली. चित्रपटासाठी प्रत्येकाने चांगलं काम केलं आहे. टीमच छान होती. म्हणून चित्रपट चांगला झाला आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचा खूप आनंद झाला.’’

चित्रपटासाठी सुमीत राघवनच्या मुलाची भूमिका करणारा मुलगाही सोजवळ हवा होता. त्याच्या मी शोधत होतो. त्यासाठी १५०० जणांच्या ऑडिशन घेतल्या, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSalil Kulkarniसलील कुलकर्णीcinemaसिनेमाNational Film Awardsराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018cultureसांस्कृतिक