शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

पांढरी काठी आजही अंधारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2015 12:24 AM

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एकविसाव्या शतकाकडे वाटचाल होत असली, तरीही अंध बांधवांची पांढरी काठी मात्र आजही अंधारातच वाट शोधत आहे.

पराग कुंकूलोळ, चिंचवडआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एकविसाव्या शतकाकडे वाटचाल होत असली, तरीही अंध बांधवांची पांढरी काठी मात्र आजही अंधारातच वाट शोधत आहे. पारंपरिक शिक्षणपद्धती, रोजगार व विवाह समस्यांमुळे हे बांधव आजही दारोदार भटकंती करत असल्याचे वास्तव राज्यात दिसत आहे. यांच्या काठीला सहकार्याची नितांत गरज असल्याचे मत अंध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.राज्यात अनुदानित ५६ आणि विनाअनुदानित १४ अशा ७० शिक्षण संस्थांच्या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांना १ली ते ७वीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. १७ अनुदानित व ९ विनाअनुदानित व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांतून रोजगारासंदर्भात शिक्षण देणे सुरू आहे. मात्र, या शिक्षणपद्धतीतून पारंपरिक धडे देण्याचे काम सुरू आहे. झाड़ू, मेणबत्ती, अगरबत्ती, खुर्च्यांचे विणकाम अशा प्रशिक्षणातून शिक्षण दिले जाते. यातून हे अंध बांधव सक्षम होतात का, हा महत्त्वाचा विषय आहे. काही संस्था आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्या, तरीही शासनाच्या उदासीन धोरणामुळे त्यांचे पुनर्वसन होत नसल्याची खंत अंध शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.दुसऱ्या महायुद्धात अनेक जवानांना व नागरिकांना अंधत्व आले. त्यावर मात करण्यासाठी अमेरिकेतील आर्मीच्या ‘व्हॉली फोर्स’मध्ये अंध जवानांना काठीच्या साहाय्याने चालण्याचे शिक्षण देणे सुरू झाले. परंतु, वापरण्यात येणारी काठी लांब व वजनाने जड होती. १९४४मध्ये रिचर्ड हूवर यांनी पांढऱ्या काठीचा शोध लावला. हलकी व घडी घालून ठेवता येणारी काठी तयार करून त्यांनी अंधांना दिलासा दिला. ही काठी भारतातील अंधांच्या हातात यायला कित्येक वर्षे लागली. डेहराडून येथे १९७१मध्ये या काठी वापरण्याचे धडे देणारे पहिले प्रशिक्षण केंद्र स्थापन झाले. शाळांमध्ये शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात आले. उपयुक्त ठरत असल्याने ही काठी भारतात बनविण्यास सुरुवात केली. मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, बंगलोरमध्ये ही काठी बनिवणाऱ्या कंपन्या आहेत.राज्यातील अंध विद्यार्थ्यांना शिक्षण साचेबंद पद्धतीने दिले जात आहे. या घटकाचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन करायचे असल्यास शासनाच्या धोरणात्मक निर्णयात बदल होणे अपेक्षित आहे. शिक्षणप्रणाली व व्यावसायिक प्रशिक्षण आधुनिक पद्धतीने होणे महत्त्वाचे आहे. पुनर्वसनाकरिता शासकीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळींची समिती स्थापन करावी. अंध-अपंगांच्या विकासासाठी घटनात्मक बदल करण्यास लढाई करावी लागेल. योजना तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणारी यंत्रणा सक्षम झाल्यास अंध बांधव स्वावलंबी होतील. - विकास पोतदार, महाराष्ट्र राज्य अपंग शाळाचालक समितीचे उपाध्यक्ष