शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

Sharad Pawar: महविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? शरद पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 5:20 PM

आमच्या पक्षाला निवडणुकीआधी मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात स्वारस्य नाही

पुणे : निवडणुकीआधी मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात आमच्या पक्षाला स्वारस्य नाही, सत्ता परिवर्तन होणे हे मला महत्त्वाचे वाटते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. बदलापूरसारख्या घटना वारंवार घडत आहेत, त्यासंदर्भात असलेल्या जनभावना व्यक्त करण्यासाठी म्हणून बंद आहे, त्यात कसलेही राजकारण नाही, असे त्यांनी सांगितले. (Maharashtra Politics)  

पुण्यात मुक्कामी आले असताना, मोदी बागेतील निवासस्थानी पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी राज्य सरकारने अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जावरही टीका केली. सत्तेत किंवा सत्तेबरोबर असणाऱ्यांच्या कारखान्यांना मदत केली गेली. राज्य सरकार अडचणीत आलेल्यांना मदत करताना नीती ठरवते. आता नीती ठरली, मात्र मदत फक्त सत्तेत असणाऱ्यांच्या कारखान्यांना केली गेली. यापूर्वी असे कधीही होत नव्हते. सरकारमध्ये मंत्र्यांकडून शपथ घेतली जाते. त्यावेळी मी निर्णय घेताना त्यामध्ये न्याय विचार करेल, असे म्हटले जाते. अडचणीत असलेल्यांना मदत करताना त्यात राजकारण आणले जात असेल, तर तो त्या शपथेचा एकप्रकारे भंगच आहे, असे पवार म्हणाले.

महाविकास आघाडीतच असलेल्या उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री कोण ते ठरवा, असे म्हटले आहे. याकडे लक्ष वेधल्यानंतर पवार म्हणाले, मुख्यमंत्री कोण असावा यात राष्ट्रवादी काँग्रेसला स्वारस्य नाही. आत्ता सत्ता परिवर्तन होणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. उत्तम प्रशासन देत राज्याचा विकास करणे, यासाठी सत्ता परिवर्तन हवे. त्यामुळे पर्याय कसा देता येईल, यालाच महत्त्व द्यायला हवे.

राज्यात अनेक ठिकाणी तुमच्याकडे येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. तसे जाहीर केले जात आहे, तुमच्या भेटीसाठी अनेकजण येत आहेत, याबाबत विचारले असता पवार म्हणाले, मी अनेक वर्षे अनेकांबरोबर काम केले आहे. त्यामुळे भेटीगाठी होत असतात. त्यात बाकीचे काही असतेच असे नाही. ३ सप्टेंबरला मी कोल्हापूरला जात आहे. तिथे जाहीर सभा घेण्याचा माझा विचार आहे. त्यात काही गोष्टी उघड करू, असे पवार यांनी सांगितले.

बदलापूर आंदोलकांमध्ये बदलापूरचे कोणीही नव्हते, बाहेरून आलेले लोक होते, अशी टीका करत पोलिस लोकांवर गुन्हे दाखल करत असल्याचे लक्षात आणून दिले असता, पवार यांनी, सरकारमधील कोणी असे बोलणे योग्य नाही, असे सांगितले. ही लोकांमधील अस्वस्थता आहे. भावना व्यक्त करायची लोकांची ती पद्धत असते. यात कोणाला राजकारण करायचे असेल, असे वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा