शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

Pune Municipal Corporation: ५१ गावांना पाणी देणार कोण? पुणे महापालिकेला अशक्य, पालिकेचे पीएमआरडीएला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 13:32 IST

पुणे महापालिकेत २०१७ मध्ये समाविष्ट झालेली ११ गावे आणि २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांना अद्यापही पालिकेला पाणी देता आलेले नाही

पुणे : पुणे शहराला खडकवासला धरणसाखळी आणि भामा आसखेड प्रकल्पातून महापालिकेला २०३२ पर्यंत १६.३६ टीएमसी पाणीसाठा मंजूर आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सद्य:स्थितीत २१ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पालिकेच्या सुधारित हद्दीजवळील ५ कि.मी.च्या अंतरातील ५१ गावांना पालिकेस पाणी देणे शक्य नसल्याचे पत्र महापालिका प्रशासनाकडून पीएमआरडीएला देण्यात आले आहे.

पुणे महापालिकेत २०१७ मध्ये समाविष्ट झालेली ११ गावे आणि २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांना अद्यापही पालिकेला पाणी देता आलेले नाही. त्यात पालिकेच्या सुधारित हद्दीजवळील पाच कि.मी. हद्दीच्या ५१ गावांना पालिकेने पाणीपुरवठा करावा, असे राज्य सरकारच्या जुन्या परिपत्रकाचा आधार घेत ‘पीएमआरडीए’ने सांगितले होते. महापालिकेसाठी पाटबंधारे विभागाने २०३२ पर्यंतच्या लोकसंख्येसाठी १६.३६ टीएमसी साठा राखीव केला आहे. महापालिकेची जुनी हद्द आणि नवीन समाविष्ट गावे पाहता महापालिकेस प्रत्यक्षात २४ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.

२०३७ पर्यंत २६ टीएमसी पाण्याची गरज आहे. तर, पीएमआरडीच्या टीपी स्कीमसाठीही पाणी लागणार आहे. त्यामुळे वाढीव पाणीकोटा मिळाल्याशिवाय, महापालिकेस पाणी देता येणार नाही, तसेच नव्याने समाविष्ट २३ गावांमधील ५ गावांसाठी पाणी योजनांचे काम सुरू असून, ते पूर्ण होण्यास दोन ते तीन वर्षांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे त्यांना किती पाणी लागेल, हे अद्याप निश्चित नाही, तसेच पाच कि.मी.च्या आदेशाप्रमाणे वाढीव पाणी कोटा मंजूर करून घेणे आवश्यक असल्याने कोटा मंजूर झाल्याशिवाय पाणी देता येणार नाही, असे पालिकेने पीएमआरडीएला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीgram panchayatग्राम पंचायतRainपाऊसPMRDAपीएमआरडीए