शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

प्रचंड ताकद उभारून देखील कांचन कुल यांना " बारामती " जिंकण्यात का आले अपयश..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 19:09 IST

'' ह्या '' गोष्टींनी कुल यांच्या पराभवाला आणि सुळे यांच्या विजयाला हातभार लावला..

बारामती  : बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असला तरी हा गड आम्ही जिंकणारच असा विश्वास व्यक्त करीत भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सुळे आणि कांचन यांच्यात ’कॉंटे की ट्क्कर’ पाहायला मिळाली. मात्र, भाजपला हा गड जिंकण्यात अपयश आले.  

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शेवटच्या काही टप्प्यात भाजपा प्रणित महायुती कुल यांच्या प्रचारात कमी पडल्याचे पाहायला मिळाले. हीच बाब सुळे यांच्या पथ्यावर पडली. तसेच सुळेंसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून दाखविलेली एकजूटही बारामतीतील विजयासाठी पूरक ठरली.त्यांनी सुरुवातीपासून जनसंपर्क; लोकांचे प्रश्न, समस्यांवर सोडविण्यावर भर देत दुष्काळी भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासही प्राधान्य दिले.त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत तरुणाईशी थेट संवाद ठेवला. गेली पाच वर्षे विविध कार्यक्रम व उपक्रमांनी मतदारसंघ पिंजून काढला होता.हि सगळी सुळे यांच्या विजयी हॅट्रिक मध्ये जमेच्या बाजू ठरल्या.  

गुरुवारी सकाळी आठ वाजता शासकीय गोदामात मतमोजणीस सुरूवात झाली. कांचन कुल यांनी आरंभापासून आघाडी घेतल्याने राष्ट्रवादीच्या कोटात अस्वस्थता पसरू लागली होती. दौंड हा कांचन कुल यांचा घरचा मतदारसंघ असल्याने त्यांना तिथे कुल यांना ६९५0 मते तर सुळे यांना २६५३ मते पडली. खडकवासल्यामध्येही त्या आघाडीवर होत्या. मात्र, बारामती, इंदापूर, भोर आणि पुरंदरमध्ये सुळे यांनी आघाडी घेतली.

पहिल्या आणि दुस-या फेरीमध्ये सुळे आणि कांचन कुल यांच्यात घासून लढत झाली. दुस-या फेरीत दौंड,खडकवासला आणि भोर, पुरंदरमध्ये कुल आघाडीवरच होत्या. दोन फेरींमध्ये सुळे यांना एकूण ५८ हजार ६२६ मते तर कुल यांना ५८ हजार ९१९ मते होती. दोघांच्या मतांमध्ये केवळ २९३ मतांचा फरक होता. कुल यांचे पारडे जड होते की काय असे वाटत असतानाच सुळे यांनी हळूहळू तिस-या फेरीनंतर मतांची आघाडी घेतली.सुळे यांनी पाचव्या फेरीनंतर आघाडी कायम राखली. दोघींच्या मतांमध्ये जवळपास १७00२ मतांचा फरक पडल्याचे दिसून आले. सातव्या फेरीमध्ये सुळे यांना एकूण २ लाख ११ हजार 0९१ तर कुल यांना १ लाख ८७ हजार ५६0 मते पडली. नवनाथ पडळकर यांना १३ हजार २00 मते पडल्याने आश्चर्य व्यक्त झाले. दहाव्या फेरीनंतर सुळे यांच्याच गळ्यात विजयाची माळ पडणार असे काहीसे चित्र निर्माण होऊ लागल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे वातावरण दिसू लागले. सुळे यांनी हळूहळू लीड घेण्यास सुरूवात केली. दहाव्या फेरीत एकूण २ लाख ९९ हजार ४0६ वरून पंधराव्या फेरीपर्यंत सुळे यांनी ४ लाख ५३ हजार ८0 पर्यंत मजल मारली. तर कांचन कुल यांना ३ लाख ५७ हजार ८४१ मते पडली. सुळे यांनी ९५ हजार २३९ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर सुळे यांचे मताधिक्य शेवटपर्यंत वाढतच गेले.. आणि बहुचर्चित तसेच भाजपाकडून प्रतिष्ठेची करण्यात आलेल्या बारामतीच्या लढतीत कुल यांना दीड लाखांहून अद्धिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला.. .........कांचन कुल यांच्या पराभवाची ५ कारणेमहाविद्यालयीन विद्यार्थी संघटना, तरूणाईशी संपर्क. सोशल मीडियाचा प्रभावी वापर ठरला राष्ट्रवादीसाठी निर्णायक.बहुतांश सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे तुलनेने राष्ट्रवादीचा अधिक जनसंपर्क आहे.राष्ट्रीय समाज पक्षाच्या तुलनेने सहकारी संस्थांवर पवार कुटुंबाचे वर्चस्व आहे.गेल्या ५ वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रभावी जनसंपर्क ठेवला. नवख्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा दौंड वगळता इतरत्र थेट जनसंपर्क कमी होता. ......................... 

टॅग्स :Baramatiबारामतीbaramati-pcबारामतीBJPभाजपाSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल