शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एम. जे. अकबरला सरकार पाठीशी का घालत आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 01:10 IST

लक्ष्मीकांत देशमुख यांचा सवाल : ‘मी टू’ चळवळीला पाठिंबा

पुणे : एम. जे. अकबरसारखे मंत्री किंवा चेतन भगतसारखे लेखक यांच्यासारख्यांना त्या पदांवर, प्रतिष्ठेवर राहण्याचा अधिकारच नाही. एम. जे. अकबर यांना मोदी सरकार का पाठीशी घालत आहे? ११ महिलांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. सरकारने त्यांना निलंबित करायला हवे किंवा त्यांनी स्वत: पायउतार व्हायला हवे. त्यांच्याकडे मंत्रिपद राहणे हे लेखक, माणूस म्हणून मला मुळीच मान्य नाही. त्यांच्यावर कारवाई होणार नसेल तर हे सरकार स्त्रीपूजक नाही असेच म्हणावे लागेल, अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘मी टू’ चळवळीला पाठिंबा दर्शवला.

आतापर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीचे शोषण होतच आले आहे. ‘मी टू’ चळवळीच्या माध्यमातून शोषणाला वाचा फुटली आहे. लैंगिक शोषण झाल्याचे जाहीरपणे सांगताना खूप धाडस दाखवावे लागते. स्वत:च्या बदनामीची चर्चा न करता ती व्यक्त होत आहे. किमान यापुढे तरी पुरुषाने स्त्रीला उपभोगाची वस्तू म्हणून पाहू नये. चेतन भगत स्वत:ला लेखक म्हणवतो. आपल्या साहित्यातून त्याने स्त्रीच्या अभिव्यक्तीबाबत सन्मानाने लिहिले आहे. असा लेखक जेव्हा लैंगिक शोषण करतो, तेव्हा फार वाईट वाटते. तुमच्याभोवती वलय निर्माण झाले, की हव्या त्या स्त्रीवर आपण हक्क गाजवू शकतो, ही मानसिकताच चुकीची आहे.लैंगिक अत्याचाराचे प्रकार सिनेमा, राजकारण, पत्रकारिता अशा सर्वच क्षेत्रांत घडत आहेत. ‘मी टू’च्या माध्यमातून या वाईट प्रवृत्तींविरोधात आवाज उठविला जात आहे. त्यामुळे माझा पाठिंबा आहे, असे ते म्हणाले.

मी टू प्रकरणी त्वरित कारवाई व्हावीदेशमुख म्हणाले, ‘‘मी टू’च्या माध्यमातून ज्या लोकांची नावे पुढे आली आहेत, त्यांच्यावर त्वरित आणि कडक कारवाई व्हायला हवी. प्रशासनाला कोणताही चेहरा नसतो. तिथेही वाईट प्रवृत्ती आहेतच; मात्र त्यांचे प्रमाण खूप कमी आहे. पद आणि जबाबदाऱ्यांमुळे त्यांच्यावर मर्यादा येतात. स्त्रीला दुय्यम मानणारी पुरुषी मानसिकता मोडीत निघायला हवी. नाना पाटेकर यांच्याविरोधात तनुश्री दत्ता यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. महिला आयोगाने त्यांना नोटीसही बजावली असून, चौैकशी सुरू झाली आहे.’’

टॅग्स :Metoo CampaignमीटूM J Akbarएम. जे. अकबरLaxmikant Deshmukhलक्ष्मीकांत देशमुख