शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

वाल्मीक कराडवर ईडीची कारवाई का नाही? सरकारची भूमिका संशयास्पद, सुप्रिया सुळेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 19:35 IST

सुरेश धस भाजपचे आहेत का? वाल्मीक कराड कोणाच्या जवळचा आहे? असे राजकारणाशी संबधित विषय यात आणायचे नाहीत

पुणे : बीडमधील मस्साजोगमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पुण्यात बोलताना केला. या गुन्हेगारी प्रकरणातील सर्व गोष्टी पोलिसांशी संबधित आहेत व हे खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे, असे म्हणत त्यांना वाल्मीक कराडवर ईडी का नाही लावली? असा प्रश्न केला.

सुळे विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी पुण्यात आल्या होत्या. त्यांनी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरण कंपनी आदी ठिकाणी बैठका घेतल्या. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले. या हत्येत प्रमुख आरोपी आहे तो पोलिसांना सापडत नाही. यात खंडणीचा गुन्हा आहे. मग त्यात पोलिसांनी नक्की काय केले? यातील आरोपींचा मोबाइल गायब आहे, असे पोलिस सांगतात. मग त्याचा फोन कॉलचा तपशील का तपासला जात नाही? असे अनेक प्रश्न विचारत खासदार सुळे यांनी सरकारवरच अप्रत्यक्षपणे संशय व्यक्त केला.

या प्रकरणात अनेकजण बोलत आहेत. मात्र, मला यात कसलेही राजकारण आणायचे नाही. प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून बोलत आहे. सुरेश धस भाजपचे आहेत का? वाल्मीक कराड कोणाच्या जवळचा आहे? असे राजकारणाशी संबधित विषय यात आणायचे नाहीत. हो गुन्हा आहे, त्याचा संबंध पोलिसांशी येतो. पोलिस खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यामुळे त्यांनीच यात बोलावे, असेही त्या म्हणाल्या. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनीच परस्परांशी बोलावे. महाराष्ट्रात शांतता कशी राहील याचा प्रयत्न करावा, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आधीच सांगितले आहे. त्याचा विचार व्हावा, माणुसकीला प्राधान्य द्यावे, पीडित कुटुंबांना आधार द्यावे, अशी अपेक्षा खासदार सुळे यांनी व्यक्त केली.

वाल्मीक कराड याच्याकडून बारामतीमध्ये काही शेतकऱ्यांवर अन्याय झाला असल्याचे बोलले जात आहे. बारामतीमध्ये गेल्यानंतर यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांबरोबर नक्की बोलणार आहे. कोणावर काही अन्याय झाला असेल तर त्याचे निराकरण करण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे, असे सुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेwalmik karadवाल्मीक कराडSupriya Suleसुप्रिया सुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी