शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विज्ञान वाढत का नाही याचे कारण आपल्यातच शाेधायला हवे : डाॅ. जयंत नारळीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 18:43 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुकामध्ये विज्ञान दिनानिमित्त शास्त्रज्ञांशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.

पुणे : शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान हे मंत्रासारखे पाठ करुन शिकवले जाते. त्यामुळे विद्यार्थी मार्क मिळविण्यापुरते विज्ञान शिकतात. माेठे झाल्यावर त्यांचे कुतूहल कमी हाेत जाते, त्यामुळे विज्ञान वाढत का नाही याचे कारण आपण आपल्यातच शाेधायला हवे असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. 

विज्ञान दिनानिमित्त आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुकामध्ये शास्त्रज्ञांशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. नारळीकर आणि आयुकाचे शास्त्रज्ञ साेमक रायचाैधरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. अवकाशात तारे असताना अवकाश काळे का दिसते ?,  या प्रश्नाचे उत्तर देताना नारळीकर म्हणाले, अवकाशात जेवढे तारे आहेत तेवढे अवकाश प्रकाशमान करण्यासाठी पुरेसे नाहीत त्यामुळे ते तारे आपल्याला दिव्यांसारखे दिसतात. ताऱ्यांच्या रंगाबाबत बाेलताना ते म्हणाले, भाैतिक शास्त्रानुसार रेडिएशनच्या तापमानावरुन त्या ताऱ्याचा रंग ठरत असताे. आपल्याला लाल रंग सर्वात जास्त तप्त असताे असे वाटते, परंतु विज्ञानानुसार निळा रंग हा लालपेक्षा अधिक तप्त असताे. सुर्याबाबत बाेलताना ते म्हणाले, सुर्यासारखे अनेक तारे अकाशगंगेत आहेत. एका टप्यानंतर सुर्यात अनेक बदल हाेतील त्याचे तापमान बदलेल तसेच त्याचा आकारही बदलण्याची शक्यता आहे. 

ग्रामीण भागात विज्ञान जास्तीत जास्त कसे पाेहचायला हवे ?, या प्रश्नाचे उत्तर देताना नारळीकर म्हणाले, विज्ञान सर्वांपर्यंत पाेहचायला हवे, केवळ शहरांपुरते ते मर्यादित असता कामा नये. विविध संस्थाकडून मदत घेऊन गावांमध्ये विज्ञान सेंटर सुरु करता येऊ शकतील. बर्मुडा ट्रंगलमध्ये अनेक विचित्र गाेष्टी घडतात असे सांगितले जाते परंतु तिथे काही नसून त्या ठिकाणी हाेणारे अपघात इतर ठिकाणी सुद्धा हाेऊ शकतात असे बर्मुडा ट्रंगलजवळ राहणाऱ्या आपल्या मित्राने सांगितल्याचेही नारळीकर म्हणाले.  

टॅग्स :Jayant Narlikarजयंत नारळीकरscienceविज्ञानPuneपुणे