शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

बालगंधर्व रंगमंदिर पाडून ‘पुलं’ना अभिवादन करणार का? महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 03:56 IST

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला या वर्षी ८ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी पुलंच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाली. ‘बालगंधर्व रंगमंदिर पाडून जनशताब्दी वर्षात पुलंना अभिवादन करणार का?’ अशा शब्दांत महाराष्ट्र साहित्य परिषदेने बालगंधर्व रंगमंदिर पाडून पुनर्विकास करण्याच्या पुणे महापालिकेच्या निर्णयाला विरोध केला आहे.

पुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला या वर्षी ८ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी पुलंच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाली. ‘बालगंधर्व रंगमंदिर पाडून जनशताब्दी वर्षात पुलंना अभिवादन करणार का?’ अशा शब्दांत महाराष्ट्र साहित्य परिषदेने बालगंधर्व रंगमंदिर पाडून पुनर्विकास करण्याच्या पुणे महापालिकेच्या निर्णयाला विरोध केला आहे.‘बालगंधर्व रंगमंदिर ही केवळ दगडविटांची निर्जीव वास्तू नाही. या वास्तूशी कलावंत आणि रसिकांचे भावनिक नाते आहे. अनेक दिग्गज कलावंत आणि सारस्वतांच्या कलाविष्काराने आणि पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू आहे. साहित्यिक आणि कलावंतांना ऊर्जा देणारे बालगंधर्व रंगमंदिर हे सर्जनकेंद्र आहे. या वास्तूची निगा व देखभाल राखण्यात पूर्णत: अपयशी ठरलेली पुणे महापालिका ही वास्तू पाडून पुनर्विकासाची योजना आखत आहे. ही बाब चीड आणणारी आहे. पुणेकर रसिकांच्या भावना लक्षात घेऊन ही वास्तू जपण्यासाठी प्रयत्न करावेत. नाट्यसंकुल दुसºया जागेत उभे करावे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय घेताना साहित्य आणि कलाक्षेत्रातील लोकांशी बोलून, त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात, असे संबंधितांना वाटत नाही यातच त्यांचा कोडगेपणा दिसून येतो,’ अशी संतप्त प्रतिक्रिया मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली.‘पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, याचा विसर महापालिकेला पडला आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे सांस्कृतिक वैभव आहे,’ असेही ते म्हणाले.जन्मशताब्दी वर्षात तरी गदिमांचे स्मारक करामहाराष्ट्रवाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाबाबत पुणे महापालिका कमालीची उदासीन आहे. ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी आली, तरी पुण्यात त्यांचे स्मारक होऊ शकले नाही. या वर्षात तरी ते करून दाखवा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.कट सुज्ञ नागरिकच उधळून लावतील : सुरेखा पुणेकरहजारो कलाकारांचे मंदिर व शहराची ओळख असलेली बालगंधर्व रंगमंदिर ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा कट सुज्ञ पुणेकरच उधळून लावतील, असे लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी सांगितले. शिवसेना शिवाजीनगर मतदारसंघाच्या वतीने बालगंधर्व येथे कलाकार-नागरिक यांची मते जाणून घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती.कलाकार आणि पुणेकरांच्या भावनांचा विचार न करता भाजपाने या वास्तूचे व्यावसायिक सेंटर उभारण्यासाठी हा घाट घातला आहे. ही वास्तू कदापि पाडू देणार नाही, असे क्षेत्रप्रमुख उमेश वाघ म्हणाले. विभागप्रमुख राहुल शिरोळे यांनी केलेल्या या आंदोलनात सुनील महाजन, अभिनेता पवनकुमार, निर्माते बाबा पठाण, मोहन कुलकर्णी, वरुण कांबळे, गायक जितेंद्र भुरूक, रेश्मी मुखर्जी यांच्यासह अनेकांनी बालगंधर्व पाडण्यास विरोध दर्शविला. सुरेखा पुणेकरांसह उपविभागप्रमुख हेमंत डाबी, मंगेश खेडेकर, सुयोग भावे, प्रवीण डोंगरे, केदार सिद्धेश्वर यांनी जनजागृती पत्रकांचे वाटप करून नागरिकांची स्वाक्षरी घेतली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र