शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

उजनीत आज पाणी सोडणार?

By admin | Published: November 23, 2015 12:52 AM

उजनी धरणात चासकमान धरणाचे पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून कळमोडी धरणाचे पाणी चासकमान धरणात सोडण्यात आले आहे.

राजगुरुनगर : उजनी धरणात चासकमान धरणाचे पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून कळमोडी धरणाचे पाणी चासकमान धरणात सोडण्यात आले आहे. उद्या म्हणजे सोमवारी पोलीस बंदोबस्तात उजनीसाठी भीमा नदीत पाणी सोडले जाईल, अशी खात्रीशीर माहिती आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने उजनीत चासकमानचे ३ टीएमसी आणि भामा-आसखेडचे ४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय २६ आॅक्टोबर रोजी घेतला होता. त्यानंतर अनेक घडामोडी झाल्या. खेडचे आमदार सुरेश गोरे, बाबूराव पाचर्णे यांच्यासह काही लोकप्रतिनिधी न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाने प्राधिकरणाच्या निर्णयास स्थगिती दिली नाही; पण पुढील सुनावणी ३० नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. न्यायालयाने पाणी सोडण्यास स्थगिती दिली नसल्याने चासकमान धरणातून पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कळमोडी या छोट्या धरणातून चासकमान धरणात पाणी सोडण्यात आले आहे. कळमोडी धरणातून सोडलेले पाणी शेतकऱ्यांनी थांबविण्यास भाग पाडले होते, तरी पुन्हा पाणी सोडण्यात आले आहे. उजनीला पाणी सोडण्यासाठी कळमोडीचे पाणी चासकमानमध्ये सोडण्यात येत आहे. चासकमानमधून उद्याच पोलीस बंदोबस्तात पाणी सोडले जाईल, अशी माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. (वार्ताहर)