शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

पुरंदर विमानतळाला जागा दिल्यास शेतकऱ्यांना वैमानिक बनवणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 4:31 PM

या विमानतळासाठी सुमारे तीन हजार हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे...

- श्रीकिशन काळे

पुणे :विमानतळाला जागा दिल्यानंतर आम्ही घर, दार सोडून जायचे कुठे? जमीन विकून पैसे हातात येतील; पण ते घेऊन करणार काय? इंडस्ट्री आली असती तर नोकऱ्या तरी लागल्या असत्या; पण आता विमानतळात आम्हा शेतकऱ्यांना वैमानिक थोडेच बनवणार आहेत ! आम्ही शेती विकल्या तर बेरोजगारच होऊ, त्यामुळे आमचा सर्व गावांचा जमीन देण्यास विरोध आहे, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे.

पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर येथे प्रस्तावित केले आहे. या विमानतळासाठी सुमारे तीन हजार हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे. त्यासाठी पारगाव, मेमाणे, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमधील ग्रामस्थांचा या विमानतळाला जमीन देण्यास विरोध आहे. त्यामुळे सरकार नेमके करणार तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

कुंभारकर म्हणाले की, आम्ही या गावातील सर्व ग्रामस्थ अल्पभूधारक आहेत. त्यामुळे शेती करून गुजराण करतो. पाणी सिंचनाची सोय पुरंदर तालुक्यात झाली आहे. शेतीवर फळबागा आहेत. सीताफळ, डाळिंब, अंजीर या फळाला चांगली मागणी आहे. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी सुखी आहोत. विमानतळ आल्यानंतर आमचे विस्थापन होणार आणि हा सर्व परिसर गजबजणार आहे. म्हणून आम्हाला ते सर्व नको आहे. जागा दिल्यानंतर आम्ही करायचे काय? एक तर इकडे कोणते उद्योग नाहीत. रोजगार कोण देणार आम्हाला?

जागा देऊन आम्ही वाॅचमनचे काम करायचे का? विमानतळामुळे सर्वत्र शहरीकरण होईल. आता निसर्गसंपन्न परिसर आहे. तिकडे चाकणला लोकांना विमानतळ हवे आहे, तर तिकडे करायला हवे. आम्हाला विमानतळ नकोय. शेवटपर्यंत आम्ही विमानतळाला विरोध करणार आहोत.

- संतोष कुंभारकर, सरपंच, उदाचीवाडी

स्थानिकांचा विराेधच

एकीकडे प्रशासन स्तरावर पुरंदर विमानतळाची अधिसूचना काढली, जमिनीचे दर जाहीर करणार, लवकर भूसंपादन करणार अशी सातत्याने चर्चा होत आहे. दुसरीकडे स्थानिक नागरिक मात्र जागा देण्यासाठी विरोध करीत आहेत.

गवताळ प्रदेशही धोक्यात

पुरंदर परिसरात कोल्हा, तरस, लांडगे यांचा अधिवास असलेली माळरानेही आहेत. त्यामुळे विमानतळ झाले तर त्यांचा संपूर्ण अधिवास नष्ट होणार आहे. येथील माळरान संवर्धन द ग्रासलॅन्ड ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे. विमानतळामुळे गवताळ प्रदेशच धोक्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरAirportविमानतळ