शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

रामदेवबाबांच्या प्रश्नांना ‘आयएमए’कडून प्रत्युत्तर मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:12 AM

पुणे : रामदेवबाबांच्या ‘पतंजली’तर्फे इंडियन मेडिकल असोसिएशनला विचारण्यात आलेल्या २५ प्रश्नांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. कोरोनाकाळात शासनाने आयुर्वेदाला ...

पुणे : रामदेवबाबांच्या ‘पतंजली’तर्फे इंडियन मेडिकल असोसिएशनला विचारण्यात आलेल्या २५ प्रश्नांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. कोरोनाकाळात शासनाने आयुर्वेदाला डावलले असल्याचे आयुर्वेदतज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, अॅलोपॅथीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याने ‘आयएमए’तर्फे पुढील दोन दिवसांत तोडीस तोड उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. अॅलोपथी विरुद्ध आयुर्वेद असा वाद नसून रुग्णसेवेला प्राधान्य द्यायला हवे, असाही सूर वैद्यक क्षेत्रातून उमटत आहे.

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी सांगितले, “कोरोनाकाळात राज्य सरकारच्या पातळीवर आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्याचा म्हणावा तितका प्रयत्न झाला नाही. आम्ही शासनाला वारंवार पत्रे लिहून पाठपुरावा केला. मात्र, काहीही प्रतिसाद मिळाला नाही. अॅलोपॅथी श्रेष्ठ की आयुर्वेद, हा वाद घालण्याची ही योग्य वेळ नाही.”

केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जग सध्या कोरोनाचा सामना करत असताना सर्वच वैद्यकशास्त्रांनी अभिनिवेश बाजूला ठेवून रुग्णसेवेला प्राधान्य द्यायला हवे, असे डॉ. गुप्ता म्हणाले. पतंजलीकडून आयएमएला काही प्रश्न विचारण्यात आले. या संदर्भात ते म्हणाले की आत्ताच्या काळात प्रतिक्रियावादी होणे उचित नाही. मात्र ही गरज का निर्माण झाली, याचाही विचार व्हावा. प्रत्येक शाखेचा वैज्ञानिक दृष्टीने विचार करून त्याचा समाजहितासाठी उपयोग व्हायला हवा. यासाठी शासनाने समन्वयाचे काम करायला हवे. अॅलोपॅथिक डॉक्टरांची इतर पॅथीचे स्वीकार करण्याची वृत्ती कमी प्रमाणात पाहायला मिळते. मात्र हे वाद बाजूला ठेवायला हवेत.

चौकट

आयुर्वेदाला दर्जा द्या, ‘मिक्सोपॅथी’ हेच भविष्य

“आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांचे आपापल्या जागी वेगळे महत्त्व आहे. रामदेवबाबांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत लगेचच निष्कर्षाप्रत येता येणार नाही. सध्या सगळेच जग गोंधळलेले आहे. या गोंधळातूनच काही प्रश्न निर्माण झाले असावेत. प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर याबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एखादी उपचार पद्धती प्रोटोकॉलमधून काढून टाकताना आयसीएमआर संस्थेने याबाबत पुरावेही द्यायला हवेत, अन्यथा शंकेला वाव राहतो. कोरोनाकाळात आयुर्वेदाला डावलले. तार्किक विश्लेषण करून आयुर्वेदातील उपचार पद्धतीला दर्जा द्यायला हवा होता. मात्र सध्या पॅथीमधील वाद महत्त्वाचा नसून रुग्णांना बरे करण्याचे प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजे. ‘मिक्सोपॅथी’ हे भारताचे भविष्य असायला हवे. सर्व वैद्यकशास्त्रांनी एकत्र येऊन भारतीय विज्ञान जगासमोर मांडणे, हाच उत्तम उपाय आहे.”

- डॉ. प्रसाद बापट, आयुर्वेदतज्ज्ञ

चौकट

रामदेवबाबांचे अधिकृत शिक्षण नाही

“रामदेवबाबा यांनी कोणतेही अधिकृत वैद्यकीय शिक्षण घेतलेले नाही. अशा पद्धतीने प्रश्न विचारण्याची त्यांची पात्रता नाही. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आयएमए बांधील नाही. प्रश्न अत्यंत बालिश आहेत. ॲलोपॅथीने आयुर्वेदावर कधीच टीका केलेली नाही. आयुर्वेद हे थोर शास्त्र आहेच; मात्र आयुर्वेदाचा आश्रय घेऊन केले जाणारे व्यापारीकरण आणि लोकांची केली जाणारी दिशाभूल चुकीची आहे. एखाद्या वैद्यकीय शाखेतील शस्त्रक्रिया दुसऱ्या वैद्यकशास्त्र शाखेत घुसवण्याने उत्कर्ष होऊ शकत नाही. आयुर्वेद विरुद्ध आधुनिक वैद्यकशास्त्र असा वाद कधीच नव्हता. त्याला तसा रंग देण्यात आला.”

-डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य

चौकट

विरोध शासकीय धोरणाला

“पतंजलीतर्फे आयएमला २५ प्रश्न विचारले. याबाबत योग्य दस्तावेज तयार करून पुढील दोन-तीन दिवसांमध्ये उत्तर दिले जाईलच. अॅलोपॅथीने कोणत्याही इतर पॅथींना नावे ठेवलेली नाहीत. ‘मिक्सोपॅथी’ हा वाद ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद असा नसून शासकीय धोरणाला आमचा आक्षेप आहे. आयुर्वेदिक शिक्षणात ॲलोपॅथीशी संबंधित शस्त्रक्रियांना परवानगी देण्याबाबत मतभेद झाले. प्रत्येक वैद्यकशास्त्राला मर्यादा असते. कोरोनाचे औषध सध्या कोणाकडेच नाही. सध्याच्या गुंतागुंतीच्या काळात शांत राहून काम करणे महत्त्वाचे आहे. आयुर्वेद ही आपली जीवनशैली आहे. मात्र, कामाचे योग्य विभाजनही गरजेचे आहे.”

- डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, कृती समिती, आयएमए