शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

हमीभावा एवढा तरी सोयाबीनला दर मिळेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:11 AM

रविकिरण सासवडे लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : केंद्र सरकारने १२ लाख टन जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीन पेंड आयातीला ...

रविकिरण सासवडे

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : केंद्र सरकारने १२ लाख टन जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीन पेंड आयातीला परवानगी दिल्याने सोयाबीनचे बाजारभाव गडगडले आहेत. बारामती बाजार समितीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल २ हजार ३०० रुपयांनी बाजारभाव खाली आला आहे. सध्या सोयाबीनला ३ हजार ८८० रुपये हमीभाव आहे. दरातील घसरण अशीच सुरू राहिली तर हमीभावा एवढा तरी सोयाबीनला दर मिळेल काय? याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

राज्यात यंदा पेरणी क्षेत्रामध्ये सोयाबीन क्रमांक एकचे पीक ठरले आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १८८ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचे पीक आहे. बाजारामध्ये सोयाबीन तेजीत असल्याने यंदाच्या वर्षी देखील सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. अगदी १२ हजार रुपये क्विंटलपर्यंत सोयाबीनचे दर पोहोचले होते. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने मात्र मागील महिन्यात २४ ऑगस्टला जारी केलेल्या एका अधिसूचनेनुसार देशात १२ लाख टन कुटलेली व जीएम गटातील सोयापेंड आयात करण्यास मान्यता दिली आहे. सोयाबीनपेंडच्या आयातीला दिलेली मान्यता शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरेल. त्यामुळे सोयापेंड आयातीवर बंदी घालावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडे केली आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्रालयाला याबाबतचे पत्र दिले आहे.

-------------------------------

मागील आठवड्यामध्ये केंद्रीय कृषिमंत्री आणि वाणिज्य मंत्री यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एक बैठक झाली आहे. यावेळी सोयापेंड आयतीमुळे बाजारातील सोयाबीनच्या दारावर झालेला परिणाम ही बाब मी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच त्यांना लेखी पत्राद्वारे देखील या आयातीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच यंदा सोयाबीनचा पेरा दुप्पट नाही. दर वर्षी कापूस आपल्यकडे क्रमांक एकचे पेरणीक्षेत्र असलेले पीक ठरते मात्र महाराष्ट्रात यंदा सोयाबीन क्रमांक एकचे पीक ठरेल.

- दादा भुसे, कृषिमंत्री, महाराष्ट्र

--------------------------

विक्रीची घाई नको; दर नक्की वाढतील...

सोयाबीनचा पेरा महाराष्ट्रात वाढला असला, तरी राष्ट्रीय पातळीवर मात्र उत्पन्नात फारशी वाढ झालेली नाही. राष्ट्रीय पातळीवर मागच्या वर्षीच्या तुलनेत फक्त २ लाख टनाचा फरक आहे. सोयाबीन विकण्याची गडबड शेतकऱ्यांनी सध्या करू नये. १२ लाख टन सोयापेंड आयात केल्याच्या निर्णयामुळे त्याचा विपरीत परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. चुकीच्या वेळी ही आयात केंद्र सरकारने केली आहे. हीच आयात केंद्र सरकारने सहा-सात महिन्यांपूर्वी केली असती तर त्याचा फायदा पोल्ट्री व्यावसायिकांना झाला असता. मात्र, सध्याच्या आयातीचा फायदा पोल्ट्री व्यावसायिकाला नाही, तसेच शेतकऱ्यांना देखील होणार नाही. सरकारने जर आपला निर्णय बदलला तर दरामध्ये वाढ होईल. मात्र आमच्या माहितीनुसार हे फार काळ चालणार नाही. एकूण १२ लाख टन सोयापेंडीच्या आयातीऐवजी केवळ ५ लाख टन सोयापेंड आयात होईल. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून न जाता इतक्यात सोयाबीनची विक्री करू नये. पुढील काळात सोयाबीनचे दर नक्की ८ ते ९ हजारांपर्यंत जातील. आम्ही देखील संघटनेच्या माध्यमातून वेअर हाऊसमध्ये ठेवलेल्या सोयाबीनवर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावीत यासाठी प्रयत्न करणार आहोत.

- राजू शेट्टी, माजी खासदार, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

---------------------------

दर पाडण्यासाठी आयात धोरणाचा हत्याराप्रमाणे वापर...

दर वर्षी सरकार शेतमालाचे दर पाडण्यासाठी हत्याराप्रमाणे आयात धोरणाचा वापर करते. निर्यातबंदी करणे, आयात करणे आणि दर पाडणे या सूत्रामुळे लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या या धोरणामुळे झाल्या आहेत. दर वर्षी हा प्रकार होतो. हे काही नवीन नाही. महाराष्ट्रात जरी सोयाबीनच्या पेऱ्यामध्ये वाढ झाली असली तरी अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये नुकसानही प्रचंड प्रमाणात झाले आहे. पेरणी झाली तेवढे पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले आहे, असे नाही. अधिक उत्पन्न झाले आणि दर पडले असे नाही तर आयातीमुळे सध्याचे दर पडले आहेत.

- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना