शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बोरी-साळवाडी पुलाचे काम रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 23:18 IST

अपघाताची शक्यता : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

राजुरी : बोरी - साळवाडी या दोन गावांना जोडणाऱ्या कुकडी नदीवरील पुलाच्या पायाचे व संरक्षण भिंतीचे काम रखडले आहे. यामुळे येथील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. दोन वर्षांपूर्वी आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पुर आला होता. पाण्याच्या प्रवाहामुळे बोरी बुद्रूक व साळवाडी (ता.जुन्नर)येथील कुकडी नदीवरील असणा-या पुलाचा पाया खचून पुलाचा काही भाग कोसळलाहोता. त्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात आला होता.

या पुलाच्या दुरूस्तीसाठी एक कोटी पंचाहत्तर लाख रूपयांचा निधी मंजुर झाला होता. त्यानंतर पुलाची दुरूस्ती करून पुल जानेवारी महिन्यामधे वाहतुकीस खुला करण्यात आला. दरम्यानच्या काळात पुलाच्या संरक्षण भिंतीचे व पायाच्या दुरूस्तीचे काम सुरूच होते. हे काम सुरू असतानाच येडगाव धरणातून कुकडी नदीत पाणी सोडण्यात आलेले होते. त्यामुळे दुरूस्तीचे काम रखडले होते. परंतु त्यानंतर येडगाव धरणातून धरणातुण पाणी सोडण्याचे बंद केलेले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याने भरावाचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, पुलाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने काम रखडले आहे. पावसाळा सुरू झाला आहे. या नदीला मोठा पुर आल्यास भराव खचला असल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पुल कोसळण्याचा धोका आहे. मागील वर्षी स्थानिक ग्रामस्थांनी या बाबत अशीच वेळोवेळी तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुलाचा पाया खचून संरक्षण भिंत पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्याने पुलाचा काही भाग कोसळला होता. या बाबत लोकमतने वारंवार वृत्त दिले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही. यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्तता आहे. मोठी दुर्घटना होण्या आधी पूल दुरूस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात