शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

‘यशवंत’ दीर्घकाळ चालवणार

By admin | Published: April 22, 2017 3:38 AM

येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा अभूतपूर्व गोंधळात पार पडली. तीमध्ये कार्यक्रम पत्रिकेवरील दीर्घ मुदतीसाठी कारखाना

लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा अभूतपूर्व गोंधळात पार पडली. तीमध्ये कार्यक्रम पत्रिकेवरील दीर्घ मुदतीसाठी कारखाना चालवायला द्यायचा ठराव मंजूर झाल्याचा दावा प्रशासकीय संचालक मंडळाने केला, तर सत्ताधारी पक्षाने लोकशाहीचा गळा घोटला असून कुठलाही ठराव मंजूर झाला नाही, असा दावा विरोधकांनी केला आहे. यशवंत सहकारी साखर कारखाना (थेऊर)ची विशेष सर्वसाधारण सभा गुरुवारी तब्बल ५ वर्षांनी कारखाना कार्यक्षेत्रावर प्रशासकीय संचालक मंडळाचे अध्यक्ष पी. आर. घोडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, प्रशासकीय संचालक मंडळ, माजी संचालक सुभाष काळभोर, सुरेश घुले, रोहिदास उंदरे, प्रताप बोरकर, सुभाष जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे, राजेंद्र खांदवे, अप्पासाहेब काळभोर, सुदर्शन चौधरी, शिवदास काळभोर, युगंधर काळभोर, सागर चौधरी, अण्णासाहेब काळभोर, प्रशांत काळभोर, सुभाष काळभोर, दिलीप घुले आदी मान्यवर उपस्थित होते.सुरुवातीला प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष पी. आर. घोडके यांनी विस्तृत प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘‘कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या सर्वांचे मिळून ७४ कोटी ६७ लाख रुपये कर्ज आहे. शासनाचे देणे साडेसात कोटी रुपये, सभासद देणी साडेपंचवीस कोटी रुपये, कामगार देणी २९ कोटी रुपये व इतर देणी २६ कोटी रुपये, असे एकूण १६३ कोटी रुपये कर्ज आहे. कारखान्याला अग्रीम उचल, ठेवी व शासनाकडून मिळणारी सबसिडी असे एकूण २१ कोटी रुपये येणे आहे. कारखाना ६ वर्षे बंद असल्याने व्याज, कामगार पगार आदी ३२ कोटी रुपयांचा बोजा वाढला आहे. कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम एक कोटी २९ लाख रुपये जमा न केल्याने कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने कारखान्याची संपूर्ण चल व अचल मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे जमीन विक्रीला अडचणी येत आहेत. तरी, सभासदांनी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन घोडके यांनी केले.’’त्यानंतर कार्यकारी संचालक साहेबराव खामकर यांनी कार्यक्रम पत्रिकेवरील ठराव मंजुरीसाठी मांडले. या वेळी विकास लवांडे यांनी सभासदांच्या आलेल्या लेखी सूचना वाचण्याची विनंती केली. या सूचना अर्जावर सह्या कुणाकुणाच्या आहेत व सह्या केलेले कारखान्याचे सभासद आहेत का, अशी विचारणा या वेळी सागर चौधरी, सुदर्शन चौधरी यांनी केली. व्यासपीठावर बसलेले किती संचालक कारखान्याचे उत्पादक सभासद आहेत, अशी विचारणा सुरेश घुले यांनी केली. या वेळी प्रशासकीय संचालक मंडळ शासनाने कायद्यानुसार नियुक्त केले आहे. तसेच, विकास लवांडे यांनी केलेला अर्ज निकाली काढण्यात आला आहे, अशी माहिती घोडके यांनी दिली. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक पांडुरंग काळे या वेळी म्हणाले, ‘‘यशवंत कारखाना हा २० हजार सभासद शेतकरी यांच्या चुलीशी निगडित असलेला प्रश्न आहे. त्यामुळे राजकारण न करता आपण सर्वांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. सर्वांनी थोडेथोडे पैसे जमवले, तर कारखाना नक्की चालू होईल.‘‘ या वेळी ठराव मंजूर करताना गुप्त मतदान घ्यावे, अशी मागणी साधना बँकेचे संचालक सुभाष काळभोर यांनी केली. जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले म्हणाले, ‘‘जमीन न विकता कारखाना दीर्घ मुदतीसाठी चालविण्यास द्यावा. दीर्घ मुदतीवर कारखाना चालवायला दिल्यावर दीडशे कोटी रुपये कोण गुंतवणार आहे, अशी विचारणा विकास लवांडे यांनी केली. दरम्यान, गोंधळाला सुरुवात झाल्यावर अध्यक्ष घोडके यांनी ठराव मंजूर झाल्याचे घोषित करून राष्ट्रगीत घेण्याचे जाहीर केले. या वेळी परत गोंधळ सुरू झाला. संचालक केशव कामठे यांनी वंदेमातरम् म्हणण्यास सुरुवात केली. त्या वेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला. त्यामुळे वंदेमातरम् बंद झाले. या वेळी राष्ट्रगीताचा अपमान केल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संचालिका पूनम चौधरी यांनी केली. दरम्यान, गोंधळातच ठराव मंजूर झाल्याचे जाहीर करून जन गण मन घेऊन सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. (वार्ताहर)- सभा संपल्यावर संचालक मंडळाच्या वतीने एक पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले. या पत्रकात कारखाना दीर्घ मुदतीसाठी कराराने भागीदारी सहयोगी तत्त्वावर सहकारी अथवा खासगी संस्थेला चालवण्यास देण्याचा ठराव मंजूर झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे.- कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देणे तसेच अतिरिक्त जमीनविक्री करून त्यामधून निधी उपलब्ध करून कारखाना चालू करायचा, हे दोन्ही ठराव नामंजूर झाल्याचे संचालक मंडळाने काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. - सभा संपल्यावर एका ऊसउत्पादक शेतकऱ्याने झालेल्या गोंधळावर खूप बोलकी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘‘या सर्व गोंधळ करणाऱ्यांचे गुरुजी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांना काय बोलायचे ते शिकवून पाठवतात. मग विद्यार्थी येथे आल्यावर गरज पडल्यास गोंधळ घालून गरज नाही पडली, तर गोंधळ न घालता आपापला ‘पक्षीय अजेंडा’ पुढे रेटण्याचे काम करतात.’’आजच्या सभेत भाजपाच्या लोकांनी सभासदांचे काहीही म्हणणे न ऐकता सभा रेटून नेण्याचा प्रयत्न केला. एकही विषय मंजूर नसताना जबरदस्तीने प्रशासक कोणत्याही चर्चेविना ‘मंजूर-मंजूर’ म्हणत होते. सभासदांच्या हिताचा विचार न करता भाजपाहिताचे प्रशासक व भाजपाचे ठराविक २-४ जण बोलत होते. सभेत कुठलाही निर्णय झाला नाही. भाजपा हुकूमशाही राबवत आहे. त्यांना खरेच कारखाना सुरू करायचा असेल, तर सभासदांना विश्वासात घ्यावे. - विकास लवांडे,प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस. राज्य सरकारमधील एका सहकार सम्राटमंत्र्याला कारखाना चालविण्यास घेण्याची इच्छा आहे. त्यामुळेच आजची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती.- सुरेश घुले, माजी संचालक