शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'तुम्ही आमचे कान, डोळे व्हा! आपण एकत्र वाढत्या गुन्हेगारीला रोखू', पोलीस आयुक्तांचे पुणेकरांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 17:11 IST

समाज कंटकांविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक करण्याचे पुणे पोलिसांचे ध्येय आहे

पुणे : पुणे पोलीस मागील काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी काम करत आहेत. मात्र यासाठी आम्हाला अजून काम कारावे लागणार आहे. त्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील आहेत यात काही शंका नाही. ही गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस आणि नागरिकांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. त्यामुळे आमचे कान आणि डोळे बनून एकत्र काम करण्याचे आवाहन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.

आशापुरा माता मंदिर आणि लोकमत तर्फे आयोजित नवदुर्गा पुरस्कार सोहळ्यावेळी बोलत होेते. राज्यातील विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, कोहिनूर समूहाचे कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ विधिज्ञ एस. के जैन,आशापुरा माता मंदिराचे ट्रस्टी विजय भंडारी, संपादक संजय आवटे, कल्याणी संभूस दर्डा आदी मान्यवर उपस्थित होते.

अमितेश कुमार पुढे म्हणाले की, महिलांची सुरक्षा हे पोलिसांसाठी प्राधान्याचा विषय आहे. समाजातील काही विशिष्ट नागरिक महिलांविरुद्ध अत्याचार करु पाहत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई होईल, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच समाज कंटकांविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक करण्याचे ध्येय महाराष्ट्र पोलिस दल आणि पुणे पोलिसांचे आहे. काही घटना घडल्या आहेत. यामध्ये बोपदेव घाटातील घटना असेल किंवा अन्य घटना यामध्ये पोलिस प्रशासन कडक कारवाई करणार आहेत. असे मत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी व्यक्त केले.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, महिलांवर सध्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे घरातील कामे एकवेळ मुलींना सांगू नका पण तिला स्वरक्षणासाठी सक्षम बनवा असा पवित्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी घ्यावा असे आवाहन केले. तसेच अनेक ग्रामीण भागत मुलींचे बालविवाह लावून दिले जातात ते देखील थांबवन महिलांच्याच हातात आहे. महिलांनी महिलांसाठी काम करण्याची गरज आहे.असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

संपादक संजय आवटे म्हणाले की, नवरात्र उत्सव साजरा होताना नवदुर्गा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सत्कार सोहळा हा महत्वाचं आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाच पण कौतुकाची बाब म्हणजे ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर आहेत. त्यामुळे नवरात्रातील ही बाब महत्त्वाची आहे. नवदुर्गा देवी म्हणून स्त्रियांना मान सन्मान देण्यापेक्षा महिलांना आधी माणूस म्हणून वागणूक द्या. महिलांकडे पाहण्याची दृष्टी पुरुषांनी बदलायला हवी. महिलांना कायम घर आणि कामचा प्रश्न विचारला जातो मात्र पुरुषांना हा प्रश्न विचारला जात नाही. ही मानसिकता बदल्याची गरज आहे. आशापुरा माता मंदिरांच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या नवदुर्गा पुरस्कार सोहळ्यात मान्यवर आणि प्रख्यात महिलांचा सत्कार केला जातो, त्यांना त्यांच स्थान मिळालं पाहिजे यासाठी या कार्यक्रम महत्वाचा आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcommissionerआयुक्तArrestअटकWomenमहिलाFamilyपरिवार