शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तुम्हाला डोळे येऊ नये, अक्कल येऊ नये, हीच व्यवस्थेची इच्छा! नागराज मंजुळेंचे सूचक वक्तव्य

By श्रीकिशन काळे | Updated: November 28, 2024 15:09 IST

महापुरूषांमुळे आज आपण चांगले जगू शकतो, पण त्यांना आपण वाटून घेतले, तर जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही

पुणे : ‘‘तुम्हाला अक्कल येऊ नये, तुम्हाला डोळे येऊ नये, अशी आजच्या व्यवस्थेची इच्छा आहे. कारण तुम्ही शहाणे व्हाल ना ! पण तुम्ही संविधान वाचा, महात्मा फुले यांचे साहित्य वाचा, तुम्हाला समतेचा, योग्य विचार समजेल, मी देखील फुलेंचे साहित्य वाचल्यानंतरच योग्य मार्गावर आलो,’’अशी भावना प्रसिध्द दिग्दर्शक, लेखक, अभिनेते नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली. तसेच महापुरूषांमुळे आज आपण चांगले जगू शकतो, पण त्या महापुरूषांनाही आपण वाटून घेतले, तर जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही, असेही ते म्हणाले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ यावर्षी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना गुरूवारी (दि.२८) प्रदान करण्यात आला. रुपये एक लाख, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता भूमी, फुले वाडा, पुणे येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला. या वेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी, वैशाली बनकर, शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, महिला शहर अध्यक्ष वैष्णवी सातव आदी उपस्थित होते.

मंजुळे म्हणाले, माझी आणि महात्मा फुले यांची ओळख एक वेगळ्या टप्प्यावर झाली. मी अंधश्रद्दा, भांडणे, व्यसनाधीता या विश्वात वावरत होतो. पण फुले यांचे साहित्य, त्यांचे विचार आत्मसात केल्यानंतर योग्य मार्गावर आलो. आज समाजात संकुचित विचार खूप वाढत आहे. लोक भक्त होत आहेत. खरंतर समतेचा विचार घेऊन आपण पुढे जायला हवे. शिवरायांनी सर्वांना सोबत घेतले, शाहू महाराज, महात्मा फुले, आंबेडकर अशा महापुरूषांनी सर्वांना सोबत घेतले होते. तो विचार आज आपल्याला पुढे न्यायचा आहे. विचार पुढे नेणारे खरे वंशज असतात. आपण या महापुरूषांचे वंशज आहोत. त्यांचे विचार नेऊया.’’

भुजबळ म्हणाले, आपले प्रेरणास्थान हे फुलेवाडा आहे. वैचारिक ‘पावर स्टेशन’ म्हणजे हा वाडा. ही समताभूमी. येथे मंजुळे यांना आपण समता पुरस्कार देतोय. कारण त्यांनी सर्व क्षेत्रात ठसा उमटवला. त्यांनी चित्रपटातून सामाजिक प्रश्नावंर आवाज उठवला. लोकांसमोर हे प्रश्न मांडणे हे खूप महत्त्वाचे आहे. ते समतेचा विचार घेऊन पुढे जात आहेत. आपण सर्वांनी देखील तेच करणे अपेक्षित आहे.’’

टॅग्स :PuneपुणेNagraj Manjuleनागराज मंजुळेChhagan Bhujbalछगन भुजबळMahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडाSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेMaharashtraमहाराष्ट्र