शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
3
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
4
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
5
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
6
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
7
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
8
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
9
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
10
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
11
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
14
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
15
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
16
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
17
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
18
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
19
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
20
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका

पेणमध्ये ६.५० लाखांच्या वर रोपांची होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 12:15 AM

लगबग सुरू : रामवाडी येथील रोपवाटिकेमध्ये अडीच लाख रोपांची निर्मिती

दत्ता म्हात्रेपेण : जागतिक पातळीवर तापमानवाढीमुळे होणाऱ्या बदलाचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. एकीकडे डोक्यावरील ऊन प्रचंड तापत आहे, तर दुसरीकडे वृक्षांअभावी सावली शोधायला जायचे कुठे? हा प्रश्न सतावत आहे. दररोज वाढत्या प्रदूषणामुळे श्वास गुदमरू लागलेला असून त्याचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हरवलेली हिरवळ उजाड माळरानावर पुन्हा नव्याने निर्माण करू, या संकल्पनेतून विविध शासकीय कार्यालयामार्फत तब्बल ६.५० लाखांच्या वर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्या अनुषंगाने सामाजिक वनिकरण विभागाच्या रामवाडी येथील रोपवाटिकेमध्ये अडीच लाख रोपांची निर्मिती करण्यात आली असल्याचे रोपवाटिकामधील अधिकारीवर्गाने सांगितले.

पेणमध्ये यावर्षी सुमारे पाच लाख वृक्षलागवडीचा संकल्प महाराष्टÑ राजवटीच्या ३३ कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने नजरेसमोर विविध शासकीय कार्यालयाने ठेवलेला आहे. यानुसार पेण वनक्षेत्र विभागाने दोन लाख वृक्षलागवडीचा संकल्प पेण वनक्षेत्रातील मोकळ्या जागांवर केलेला आहे. त्याची पूर्वतयारी सध्या जोरदार सुरू असल्याचे वनक्षेत्रपाल गायकवाड यांनी सांगितले. दुसरीकडे पेणच्या सामाजिक वनिकरण विभाग दोन लाख २० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, या विभागाची अडीच लाख विविध प्रकारची रोपे त्यांच्या रोपवाटिकांमध्ये लागवडीसाठी सज्ज झाली असल्याचे वनअधिकारी म्हात्रे यांनी सांगितले. पेण पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ६२ ग्रामपंचायतींना प्रत्येकी तीन हजार २५० या प्रमाणे एकूण दोन लाख ११ हजार २५० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, असे गटविकास अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी कृषी विभागामार्फत माहिती घेऊन सांगितले. याशिवाय जेएसडब्ल्यू स्टील कंपनी व विविध सामाजिक संस्था तसेच निमशासकीय कार्यालय हेसुद्धा वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होणार आहेत.

झाडांची संख्या कमी झाल्याने प्रदूषणात वाढमहाराष्ट्र राज्यात २०१० मध्ये सात लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावर वृक्ष आच्छादन होते. हे राज्याच्या एकूण भूभागाच्या २.३ टक्के इतके होते. २०१७ मध्ये यामधील ८०४ हेक्टर क्षेत्रावरील वृक्ष आच्छादन नष्ट झाले. परिणामस्वरूप ७०.८ किलो टन कार्बन डायआॅक्साइडच्या उत्सर्जनास चालना मिळाली.

यामुळे प्रदूषणात वाढ होऊन प्रदूषणाचा निर्देशांक वाढला. सन २००१ ते २०१७ या कालावधीत १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील वृक्ष आच्छादनाची हिरवळ नष्ट पावली आहे. ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या ताज्या अहवालात देशासहित राज्यातील हरवलेल्या हिरवळीचा उल्लेख करून त्यावर अहवालात नेमके बोट ठेवण्यात आलेले आहे.

दरवर्षी साजरा होणारा जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने हिरवळ पुन्हा नव्याने निर्माण करणे मानवाच्या संस्कृतीच्या हिताचे आहेच. सजीव सृष्टीचे रक्षण करण्यासाठी ‘झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे संरक्षण ही संकल्पना सध्या चांगलीच जोर धरू लागली आहे.