शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चुकीचे, खोटे पंचनामे केल्यास कारवाई; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 04:21 IST

कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनला गुरुवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत. तसेच निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

रायगड : खोटे अथवा चुकीचे पंचनामे करुन कोणी मदत लाटण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिला. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनला गुरुवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत. तसेच निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. निसर्ग वादळात घरांचे मोठ्या संख्येने नुकसान झाले आहे. त्यातील ७६ टक्के नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरीत मदत लवकरच देण्यात येईल. काही ठिकाणी सात बारावर अधिक नावे असणे, बँकेतील खाते नंबर चूकीचा असणे अशा काही तांत्रीक चुकांमुळे मदत मिळण्यास अडचण येत आहे. मात्र नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. मासेमारी बोटींचे, जाळ्याचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी निधीची गरज असल्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

कोरोनाचा धोका वाढत आहे. प्रशासनाने तीन हजार खाटांचे नियोजन केले आहे. १०० दिवस नागरिकांनी साथ दिली आता पुढील १०० दिवस कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करावे, तरच आपण कोरोना विरोधातील युध्द जिंकू असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे उपस्थित होते.कोरोनामुळे लॉकडाऊन हा उपाय नाही

  • लॉकडाऊन आणि कंपनी बंद करणे हा कायमस्वरुपी उपाय नाही. त्यामुळे लॉकडाऊन करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जेएसडब्ल्यू, सुदर्शन दिपक फटीर्लायझर, रिलायन्स अशा विविध कंपन्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यासाठी त्या कंपन्यांच बंद करणे योग्य ठरणार नाही.
  • तसे केले तर कोरोनामुळे कमी आणि भूकमारीने जास्त मृत्यू होतील असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी किमान दोन खाटा राखून ठेवाव्यात. त्याचे बिल महात्मा फुले जन आरोग्य अभियान योजनेतून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

१२ जुलैपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होणारमाणगाव, म्हसळा, रोहा आणि श्रीवर्धन तालुक्यातील १९० गावांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत. ५ जुलैपर्यंत माणगाव, म्हसळा, रोहा तर श्रीवर्धन तालुक्यात १२ जुलैपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळRaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस