शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

माहिती अधिकाऱ्यांचा पत्ता कट

By admin | Published: January 01, 2016 11:58 PM

वाचन संस्कृती टिकून राहावी; त्याचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी राज्य सरकारच्या ‘सांस्कृतिक धोरण २०१०’ नुसार प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रंथोत्सव’ साजरा करण्याची संकल्पना पुढे आली.

- आविष्कार देसाई,  अलिबागवाचन संस्कृती टिकून राहावी; त्याचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी राज्य सरकारच्या ‘सांस्कृतिक धोरण २०१०’ नुसार प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रंथोत्सव’ साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. ३५ जिल्ह्यांत साजरा करण्यात येणारा ग्रंथोत्सव हा कार्यक्रम जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयांकडून आता काढून घेण्यात आला आहे. वाचनाची चळवळ खेड्यापाड्यात खऱ्या अर्थाने पोचविणाऱ्या जिल्हा ग्रंथालयामार्फतच हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ५२ लाख ५० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये विविध तारखांना ‘ग्रंथोत्सव १६’ हा कार्यक्रम पार पडणार आहे. पालघर जिल्हा हा नव्याने निर्माण झाला असल्याने त्या ठिकाणी जिल्हा ग्रंथालय सुरू झालेले नाही. त्यामुळे तेथे हा कार्यक्रम होणार नाही. राज्य सरकारच्या ‘सांस्कृतिक धोरण २०१०’ नुसार प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सव कार्यक्रम घेण्यास सुरुवात झाली. राज्यातील वाचन संस्कृती टिकून राहावी, प्रत्येकाला वाचनाची सवय लागावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा ग्रंथालय उभारली आहेत. राज्यात सुमारे १२ हजार ५०० च्या आसपास सरकारी ग्रंथालये आहेत. वाचनाची चळवळ, संस्कृती पिढीपर्यंत नेता यावी, यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे ग्रंथोत्सव होय. हा ग्रंथोत्सवाचा कार्यक्रम जिल्हा माहिती अधिकारी कार्यालायामार्फत राबविला जात होता. मात्र सातत्याने ज्यांची नाळ वाचन संस्कृतीशी जोडली गेली आहे. त्या जिल्हा सरकारी ग्रंथालयांना ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्याचे अधिकार नव्हते. त्यामुळे हे वाचनप्रेमींना सातत्याने खटकत होते.याबाबतची वस्तुस्थिती ग्रंथालय संचालनालयाचे संचालक किरण धांडोरे यांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ३ डिसेंबर २०१५ रोजी याबाबतचा सरकारी निर्णय सरकारने प्रसिद्ध केला. त्यानुसार आता जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून हा कार्यक्रम काढून घेऊन ग्रंथोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी त्या त्या जिल्हा ग्रंथालयावर देण्यात आली आहे. पूर्वीप्रमाणेच जिल्हाधिकारी ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष राहणार आहेत, तर जिल्हा माहिती अधिकारी हे आता सदस्य असणार आहेत.जिल्हा सरकारी ग्रंथालयामार्फत जानेवारी ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत ग्रंथोत्सव पार पडणार आहे. वाचकांना एकाच ठिकाणी सर्व साहित्य उपलब्ध व्हावे, तसेच प्रकाशक आणि ग्रंथविक्रेता यांना एकाच ठिकाणी ग्रंथविक्रीसाठी जागा मिळावी, हा उद्देश आहे.-किरण धांडोरे, संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई