शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

९९ टक्के शाळा, अंगणवाड्यांना पुरेसे पिण्याचे पाणी

By निखिल म्हात्रे | Published: April 05, 2024 3:36 PM

‘जलजीवन मिशन’नुसार जिल्ह्या २५० पेक्षा अधिक योजना पूर्ण

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : जलजीवन मिशन कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील ९९ टक्के शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत शाळांमधील मतदान केंद्रांनाही यामुळे पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात ‘हर घर नल - हर घर जल अभियान’ राबवण्यात येत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. आतापर्यंत जलजीवन मिशनच्या २५० पेक्षा अधिक योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर, उर्वरित प्रगतिपथावर आहेत. या योजनेअंतर्गत गावे वाड्यांबरोबर तेथील शाळांनाही पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांबरोबरच शाळांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते आहे. पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच स्वच्छतागृहांचीही गंभीर समस्या निर्माण झाली होती. शौचालयांचा वापर करता येत नव्हता. ही समस्या निकाली काढण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशन योजनेतील पाण्याची जोडणी शाळांनाही देण्यात आली. त्यामुळे ज्या शाळांमध्ये पाणीसमस्या भेडसावत होती, ती निकाली निघाली आहे. जिल्ह्यातील ३ हजार १५५ शाळा आणि ३ हजार ५१ अंगणवाड्यांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. आता शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी तर उपलब्ध झाले असून, स्वच्छतागृहाचा वापर करणे सहज शक्य झाले.मतदारांनाही सुविधा -

रायगड लोकसभा मतदार संघासाठी येत्या ८ मे रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात २ हजार ६९४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. बहुतांश केंद्रे ही शाळांमध्येच आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रांवर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह अशा सुविधा पुरवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जवळपास सर्व शाळांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. निवडणुकीच्या काळात हा मोठा दिलासा मानला जात आहे.जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ९९ टक्क्यांपेक्षा अधिक शाळा आणि अंगणवाड्यांना नळजोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. केवळ ३ शाळा आणि २ अंगणवाड्यांचे पाणी पुरवठ्याचे काम शिल्लक आहे. ते एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होईल. - संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :alibaugअलिबाग