शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
2
ठाकरेंनी सांगोल्यातून कुणाला उतरवले मैदानात?; शहाजीबापू पाटलांचे वाढले टेन्शन!
3
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल घराघरात पोहचवा; उद्धव ठाकरेचं आवाहन
4
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; "शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई एअरपोर्टवर.."
5
लाजवाब! Sarfaraz Khan चा लवचिक अंदाज अन् त्यानं मारलेला कडक फटका बघाच (VIDEO)
6
Yahya Sinwar Death: याह्या सिनवारनंतर हमासची कमान कोण सांभाळणार? 'हे' टॉप ५ लीडर शर्यतीत...
7
ठाकरेसेनेची सत्तारांविरोधात मोठी प्लॅनिंग; थेट भाजपा नेत्याला पक्षात घेणार,२०० गाड्या मुंबईकडे
8
“शरद पवार ४ वेळा CM, केंद्रात-राज्यात एकच सत्ता, तरी राज्याचा विकास केला नाही”: उदयनराजे
9
"आई, मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जातेय"; कुटुंबीय वाट पाहत राहिले पण मुलगी घरी आलीच नाही
10
आप नेते सत्येंद्र जैन यांना अखेर जामीन मंजूर; तब्बल 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर
11
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
12
Kareena Kapoor : सैफ नव्हे 'या' अभिनेत्यासाठी वेडी झाली होती करीना कपूर; बाथरूममध्ये लावलेले पोस्टर
13
“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?
14
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर काय घडलं? अक्षय कुमार-माधवनचा आगामी सिनेमा 'या' घटनेवर आधारीत
15
'वाळवा विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक'; सदाभाऊ खोतांनी उमेदवारीची केली मागणी
16
"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद
17
सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनविरोधातील खटला बंद, सर्वोच्च न्यायालयाने दिली महत्त्वाची माहिती
18
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
19
जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...
20
अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?

अनेक मंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे प्रशासनाची होतेय दमछाक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 12:36 AM

पंचनामे, मदत, पुनर्वसन, दैनंदिन कामे अडली

अलिबाग : कोकणात निसर्ग वादळाने थैमान घालून प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. नुकसानीच्या विवंचनेत असलेल्या नागरिकांना अद्यापही मदत पोहोचण्यात अडथळा येत आहे, तर दुसरीकडे मंत्री आणि नेत्यांच्या पाहणी दौऱ्यांचे चांगलेच पेव फुटले आहे. प्रशासनाला सातत्याने त्यांच्या दिमतीला उभे राहावे लागत असल्याने महत्त्वाची कामे मागे पडत असल्याचे चित्र आहे.३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगलेच नुकसान केले आहे. नारळ, सुपारी, आंबा आणि काजूच्या बागा उद्ध्वस्त केल्या आहेत. लाखो नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे, तर हजारो घरांवरील छप्पर उडाले आहे. कोणी आपल्या कुटुंबातील माणूस गमावला आहे. चक्रीवादळाने माजवलेल्या नुकसानीची भयानकता फार मोठी आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याला वादळानंतर तातडीने सुरुवात केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र अद्याप १० दिवस होत आले तरी मदत पोहोचण्यात अडथळा येत असल्याचे दिसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४ जून रोजी अलिबाग येथे १०० कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. सदरची मदत तातडीची असली तरी प्रत्यक्षात ती ११ जून रोजी संबंधित जिल्ह्यांकडे वर्ग करण्यात आली.दरम्यानच्या कालावधीमध्ये कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. आज एक मंत्री, नेता आला तर दुसºया दिवशी अन्य नेता जिल्ह्यात येत आहे. परंतु मंत्री, नेत्यांच्या पाहणी दौºयामुळे अख्खी प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या दावणीला बांधावी लागत असल्याचे दिसून येते. तलाठ्यापासून ते जिल्हाधिकाºयांपर्यंतचे सर्व महसूल अधिकारी, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद अशा सर्वच कर्मचारी आणि अधिकारी यांना त्यांच्या मागे धावावे लागत आहे. त्यामुळे पंचनामे करणे, मदत, पुनर्वसन करणे, मान्सूनपूर्व तयारी, कोरोनाचा मुकाबला आणि दैनंदिन कामे पडून राहत आहेत. ती पूर्ण करताना अधिकारी आणि कर्मचाºयांची कमालीची दमछाक होत असल्याचे दिसून येते.यांनी दिली भेटआतापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मदत व पुनर्वसन मंत्री प्राजक्त तनपुरे, कृषिमंत्री दादाजी भुसे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मत्स्य व बंदर मंत्री अस्लम शेख, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री, नेत्यांनी येथे भेट दिली आहे.पालकमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे हे जिल्ह्यातील असल्याने ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस