शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये भाजपला दिलासा, हिंदू मतदारांमध्ये उत्साह; ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान
2
Pager Explosion : पेजरमध्ये बसवून घडवले स्फोट, ते PETN स्फोटक काय?
3
Ganesh Visarjan 2024 Live: 'लालबागचा राजा'चं विसर्जन; साश्रू नयनांनी भक्तांनी दिला निरोप
4
'बुलडोझर' कारवाईला सुप्रीम कोर्टाचा ब्रेक; आदेशात नेमकं काय म्हटलंय? जाणून घ्या
5
"मॅम नव्हे, माँ अमृता फडणवीस", मंगलप्रभात लोढा यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं कौतुक! 
6
"...याला म्हणतात मनाने मोठा असलेला माणूस", प्रसाद ओकने सांगितला मुख्यमंत्री शिंदेंचा 'तो' किस्सा
7
Video: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहतीला अश्रू अनावर, अरिजीत सिंहने काय केलं पाहा; होतंय कौतुक
8
अशी सुरू झाली होती सलमान-ऐश्वर्याची लव्हस्टोरी, सोमी अली म्हणाली- "नोकरांनी सांगितलं की..."
9
'शरद पवारांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा...'; अशोक सराफ यांनी सांगितला मजेशीर किस्सा
10
केंद्राने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स शून्यावर आणला; पेट्रोल, डिझेलच्या किंमती कोसळणार?
11
Innomet Advanced Materials IPO: 'या' आयपीओचं जबरदस्त लिस्टिंग; बाजारात येताच १००% नफा, विकायलाही कोणी तयार नाही!
12
राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?
13
EPFO Calculation: दर महिन्याला केवळ 'इतकं' योगदान, नंतर तुमच्या पीएफ खात्यात जमा होती ३ ते ५ कोटी; पाहा कॅलक्युलेशन
14
...तर २ टर्म मी केंद्रात मंत्री असतो; मुख्यमंत्रिपदावरून नाना पटोलेंचं थेट उत्तर
15
Video: आर्या जाधवची अमरावतीत रॅली, सादर केलं रॅप; चाहत्यांचा तुफान प्रतिसाद
16
IND vs BAN : 'रन बरसेगा..' किंग कोहली 'रन बरसे!' रैनाची 'विराट' भविष्यवाणी
17
"बिग बॉस मराठीचे चार सीझन गाजले नाहीत", केदार शिंदेंच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले- "रितेशच्या जागी..."
18
"तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका"; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला
19
"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा
20
नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी

उमटे धरणावरील जलशुद्धीकरण सुरू, ४१ वर्षांनी ६२ गावांची शुद्ध पाण्याची प्रतीक्षा संपली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 4:51 AM

अलिबाग तालुक्यातील उमटे धरणावर अखेर जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल ४१ वर्षांनी ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग - तालुक्यातील उमटे धरणावर अखेर जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल ४१ वर्षांनी ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे. ६२ गावे-वाड्यातील सुमारे ६० हजार ग्रामस्थांना उमटे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा फायदा होणार आहे. देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे लोटली तरी, ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागत होते. आता शुद्ध पाणीपुरवठा होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये १९७८-७९ या कालावधीत उमटे धरण बांधण्यात आले होते. या धरणामुळे या विभागातील १५ ग्रामपंचायतींमधील तब्बल ५२ हजार ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीलाही मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे; परंतु धरण बांधल्यापासून धरणामध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले नव्हते. त्याचप्रमाणे धरणातील गाळ देखील काढण्यात आलेला नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागत होते. आता जल शुद्धीकरण यंत्र बसवण्यात येऊन ते सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याबद्दल ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे विशेष आभार मानले आहेत.जिल्हा परिषदेने सुमारे साडेसहा कोटी खर्चाच्या जलशुद्धीकरण योजनेला मंजुरीही दिली होती, मात्र ठेकेदाराने काम पूर्ण करण्याआधीच सुमारे दोन कोटी ९० लाख रुपयांची रक्कम अदा केली होती. या विरोधात ग्रामस्थांनी प्रशासन आणि सरकारकडे तक्रारीही केल्या होत्या.काँग्रेस आणि शिवसेनेने याबाबत रायगड जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. धरण उशाला असल्याने पाणी मुबलक प्रमाणात मिळते; परंतु त्या पाण्यामध्ये कचरा, प्लॅस्टिकचे तुकडे, कुजलेली पाने मोठ्या प्रमाणात आढळायचे. काही वेळेला मृत जनावरेसुद्धा त्यामध्ये पडलेली असायची. यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागायचे.गावांमध्ये एमआयडीसीचे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामस्थ उमटे धरणातील पाणी गाळून घ्यायचे. त्यानंतर त्या पाण्यावर तुरटी फिरवून तेच पाणी पिण्यासाठी वापरायचे. जिल्हा परिषदेने यावर उपाययोजना म्हणून तेथे जल शुद्धीकरण यंत्र बसवणे, पाइप लाइनच्या कामासाठी सुमारे तीन कोटी ३४ लाख रुपये देऊ केले होते. मात्र, आधीच्या ठेकेदाराने काम न करताच तब्बल दोन कोटी ९० लाख रुपयांचा निधी लाटल्याबाबत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, अ‍ॅड. काँग्रेसचे कौस्तुभ पुनकर, अ‍ॅड. राकेश पाटील यांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत प्रशासनाने नवीन ठेकेदाराची नेमणूक केली. त्यांनी जलशुद्धीकरण यंत्र बसवल्यानेआता शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे.जलशुद्धीकरण यंत्र बसवण्याचे काम देण्यात आले होते. ते काम पूर्ण करण्यात आले आहे. ग्रामस्थांना आता शुद्ध पाणी मिळणार आहे, असे ठेकेदार शशांक सावंतदेसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे मानले विशेष आभारआधीच्या ठेकेदाराने उमटे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील २ कोटी ९० लाख रुपयांचा निधी हडप केला आहे. त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. याप्रकरणी रायगड जिल्हा प्रशासनाने योग्य ती चौकशी करून संबंधितांकडून रक्कम वसूल करावी, अशी मागणी अ‍ॅड. कौस्तुभ पुनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. ‘लोकमत’ने सातत्याने याबाबत पाठपुरावा केला होता. आज अखेर ग्रामस्थांना ‘लोकमत’मुळे न्याय मिळाला आहे. त्यामुळे ‘लोकमत’चे आभार मानतो, असेही अ‍ॅड. पुनकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड