शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कर्नाटकमधून फरार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 04:43 IST

सागर पाटील खून प्रकरण । २७ मेपर्यंत पोलीस कोठडीचे न्यायालयाचे आदेश

अलिबाग : कुरुळ येथील दत्त टेकडी परिसरात झालेल्या सागर पाटील खुन प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र प्रकाश मगर व समीर उर्फ कुलदीप लालदेव चव्हाण या दोघांना गाणगापूर (कर्नाटक) येथे अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी जितेंद्र मगर यांचा मोठा भाऊ गुन्ह्यातील मुख्य आरोपी राजेंद्र मगर यांचे वडिलोपार्जित मिळकतीवरून वाद होते. आरोपी राजेंद्र याने त्याच्या कटात आरोपी नीलेश वाघमारे (रा. गोविंद बंदर, अलिबाग) व समीर उर्फ कुलदीप लालदेव चव्हाण (रा. हवेली, पुणे) यांना सामील करून घेतले. १ एप्रिल रोजी मध्यरात्री जितेंद्र हे मित्रांसह कुरुळ-दत्तटेकडी येथून कुरुळ गावाकडे येत असताना, टेकडीच्या पायथ्याशी दबा धरून बसलेल्या तिघांनी गोळीबार करून सागर पाटील यांचा खून केला. तर यात गौरव चंद्रकांत भगत (रा. कुरुळ) यांस जखमी केले होते. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नीलेश दशरथ वाघमारे यास पकडण्यात पोलिसांना तत्काळ यश आले होते; परंतु राजेंद्र प्रकाश मगर व समीर उर्फ कुलदीप लालदेव चव्हाण हे फरार झाले होते. या दोघांचा पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे शोध घेण्यात आला. हे दोघेही वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नाव धारण करून वावरत होते. या तपासादरम्यान पथकास मिळालेल्या माहितीनुसार यातील या दोघा आरोपींना गाणगापूर (कर्नाटक) येथे मोठ्या अटक करण्यात आली. रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व अलिबाग पोलीस यांच्या संयुक्त शोधपथकाने ही कारवाई के ल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांनी दिली आहे.दोघांनाही पोलीस कोठडीराजेंद्र मगर व समीर चव्हाण या आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही २७ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे हे करीत आहेत.