शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

जिल्ह्यातील पर्यटकांची परतीच्या प्रवासाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 3:44 AM

सुट्ट्या संपल्यामुळे पर्यटकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे गेले तीन दिवस हाउसफुल झालेले रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे खाली झाले आहेत

अलिबाग : सुट्ट्या संपल्यामुळे पर्यटकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे गेले तीन दिवस हाउसफुल झालेले रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे खाली झाले आहेत. वीकेण्डला फूल टू धमाल करीत पर्यटकांनी मनमुरादपणे सुट्टीचा आनंद लुटला. सायंकाळनंतर पर्यटकांनी आपापले घर गाठायला सुरुवात केली. त्यामुळे अलिबाग-मुंबई, अलिबाग-पुणे या मार्गावर वाहनांची गर्दी दिसत होती.शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग सुट्ट्या आल्याने अलिबाग, वरसोली, मांडवा, किहीम, आक्षी, नागाव, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर यासह अन्य समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले होते. पर्यटकांचा सलग तीन दिवसांचा वावर असल्याने शहरातील रस्तेही चांगलेच गजबजून गेले होते.मुंबई, पुण्यासह विशेषत: परदेशी पर्यटकांनीही या सुट्ट्यांमध्ये हजेरी लावल्याचे दिसून आले.मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने येथील हॉटेल, रेस्टारंट, बार, लॉजिंग, रिसार्ट, कॉटेजेस फूल झालेहोते. पर्यटक समुद्रकिनाऱ्यांना पसंती देत असल्याने तेथील वॉटर स्पोर्ट्स, बनाना राइड, एटीव्ही राइड, घोडे सवारी, उंटाची सफर यासह अन्य मनोरंजनाची सेवा पुरवणाºया व्यावसायिकांच्या चेहºयावर हसू पसरल्याचे दिसले.सलग आलेल्या सुट्ट्यांचा आनंद मनमुरादपणे लुटल्यानंतर मंगळवार, १ मे राजी पर्यटकांनी सायंकाळी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे गजबजून गेलेले समुद्रकिनारे ओस पडत असल्याचे दिसले. अलिबाग एसटी आगार, तसेच कॅटमरॅन सेवा पुरवणाºया कंपन्यांच्या कार्यालयाबाहेर पर्यटकांची गर्दी दिसली. काही पर्यटक हे स्वत:च्या वाहनाने आले होते. त्यांनीही दुपारनंतर अलिबागमधून माघारी जायला सुरुवात केली. त्यामुळे अलिबाग-पेण, पेण-पनवेल, पनवेल-मुंबई, पनवेल-ठाणे, त्याचप्रमाणे अलिबाग-पुणे या मार्गांवरही वाहनांची वर्दळ होती.