शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
3
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
4
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
5
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
6
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
7
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
8
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
9
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
10
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
11
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
12
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
13
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
14
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
15
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
16
स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार
17
बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन
18
वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
19
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
20
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव

भाताला साडेचौदा रु पयांचा हमीभाव

By admin | Published: January 05, 2016 2:05 AM

कोकणात पिकवल्या जाणाऱ्या भात पिकाला उत्तम हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी या पिकापासून दूर जात आहेत. त्यामुळे सरकारने या भाताला

दासगाव : कोकणात पिकवल्या जाणाऱ्या भात पिकाला उत्तम हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी या पिकापासून दूर जात आहेत. त्यामुळे सरकारने या भाताला १४ रुपये ५० पैसे हमीभाव दिला आहे. यापेक्षा कमी दराने भात विक्री झाली असल्यास शेतकऱ्यांनी रायगड जिल्हा शेतकरी संघटनेकडून संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कोकणात एक वेळचे भातपीक घेतले जाते. हे पीक घेत असताना शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीतच गुंतला असल्याने आणि कोकणातील भौगोलिक स्थिती पाहता भातपीक न परवडणारे ठरू लागले आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी अवस्था आहे. मात्र आता यामध्ये हळूहळू सुधारणा होऊ लागली असून, पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक यंत्राचा वापर कोकणातील शेतकरी करू लागले आहेत, असे असले तरी कोकणातील शेतकऱ्यांच्या भातपिकाला चांगला भाव मिळावा याकरिता राजकीय पुढारी शासनदरबारी भांडत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे भातपीक केवळ घरापुरतेच सीमित राहिले आहे. रायगड जिल्हा शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यानंतर शासनाने भात खरेदी केंद्र सुरू करण्याबरोबरच साधारण दर्जाच्या भाताला १४ रुपये १० पैसे तर अ दर्जाच्या भाताला १४ रुपये ५० पैसे हमीभाव देण्याचे आदेश दिले आहेत. यापैकी कमी दराने भात खरेदी होत असेल तर कृषी उत्पन्न बाजार समितीने आळा घालणे गरजेचे असल्याचेही सांगितले आहे.