भाजप आता भ्रष्टाचारी जनता पक्ष बनलाय, उल्का महाजन यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 01:53 PM2024-04-01T13:53:58+5:302024-04-01T13:54:16+5:30

उरण येथील संविधान आणि लोकशाही विचार मंथ या संघटनेच्या विद्यमाने सोमवंशी क्षत्रिय पाठारे सभागृहात रविवारी आयोजित जाहीर सभेत महाजन बोलत होत्या. 

BJP has now become a corrupt Janata Party, Ulka Mahajan criticized the ruling party in Uran's meeting. | भाजप आता भ्रष्टाचारी जनता पक्ष बनलाय, उल्का महाजन यांची घणाघाती टीका

भाजप आता भ्रष्टाचारी जनता पक्ष बनलाय, उल्का महाजन यांची घणाघाती टीका

- मधुकर ठाकूर 

उरण : स्वतःची पार्टी विथ डिफरंस ही ओळख आता भाजपने संपवून टाकली आहे. आता तो म्हणजे  भ्रष्टाचारी जनता पक्ष बनला आहे. लोकांना लाचार बनवायचे आणि आपले इप्सित साध्य करायचे उद्योग त्या पक्षाने आणि नेत्यांनी सुरू केले आहेत, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी केली. उरण येथील संविधान आणि लोकशाही विचार मंथ या संघटनेच्या विद्यमाने सोमवंशी क्षत्रिय पाठारे सभागृहात रविवारी आयोजित जाहीर सभेत महाजन बोलत होत्या. 

वैचारिक क्षेत्रातील कार्यकर्ते या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाजन म्हणाल्या, सरकार इतके निर्दयी बनलंय की सामान्यांना लाचार ठेवण्यात या सरकारला असुरी आनंद आहे. ८० टक्के कुटुंबांना मोफत धान्य देण्याच्या गमजा मारणाऱ्या सरकारला आपला देश गरिबीची रेषा ओलांडतो आहे. याचेही काही पडलेले दिसत नाही. बेरोजगारी रसातळाला पोहचली असताना खोटे आकडे समोर करण्यात सरकार धन्यता मानत आहे. १४१ देशातील बेरोजगारीच्या आकडेवारीत भारताचा क्रमांक १११ वर पोहोचला असल्याचे महाजन म्हणाल्या. 

भूक वाढविणे ही सत्ताधाऱ्यांच्या डिझाईनचा भाग बनला आहे. भूक वाढली की काही सुचत नाही. देशवासीयांना भुकेला ठेवत सरकारने नोटबंदी लादली. मागल्या दाराने जीएसटी लावण्यात आला. एनआरसी लागून लोकांना भयाखाली आणण्यात आले. हे करता करता  शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यात आले, असे, महाजन म्हणाल्या.

विदर्भ कवी गोविंद पोलाड यांनी आपल्या भाषणात भाजपच्या सरकारला निर्दयी सरकार संबोधलं. रामाच्या नावाने राजकारण करणारा भाजप आणि त्यांचे नेते खरे एक वचनी असतील तर त्यांनी लोकांना १५ लाख रुपये देण्याचा वादा पूर्ण करून दाखवावा असं आव्हान दिले. संसदेचा आणि राष्ट्रपतींचा अवमान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नापास पंतप्रधान आहेत अशा शब्दात पोलाड यांनी टीकास्त्र सोडले. 

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार यांनी देशभर लिखाण स्वातंत्र्याच्या होत असलेल्या गळचेपीच्या घटनांचा मागोवा घेताना अशा घटनांचे आकडेच समोर आणले. देशात माध्यमांचे स्वातंत्र्य हे आता नसल्यागत झाल्याचे चुंचुवार म्हणाले. आता विवेकी आवाज संपला तर देशाचे काही खरे नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रवीण पुरो यांनी केले.

Web Title: BJP has now become a corrupt Janata Party, Ulka Mahajan criticized the ruling party in Uran's meeting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड