शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

‘जेएनपीए’तील मालवाहू जहाजांना मिळणार सौरऊर्जा; देशातील पहिलाच पायलट प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 07:24 IST

१०० कोटींचा असणार प्रकल्प, प्रदूषण कमी होऊन इंधनाचा खर्च वाचणार

मधुकर ठाकूर , लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : जेएनपीए बंदरात उभ्या असलेल्या जहाजांना सौर ऊर्जा देण्यासाठी व पेट्रोल, डिझेलचा वाढता वापर दूर करण्यासाठी बंदर प्राधिकरणाने बंदरावरील किनारपट्टीवर विद्युतपुरवठ्यासाठी सौरऊर्जेवर चालणारा पायलट प्रकल्प राबविण्याची तयारी सुरू केली आहे. देशातील बंदरातील हा पहिलाच पायलट प्रकल्प ठरणार असून, तो उभारण्यासाठी जेएनपीए १०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. 

या पायलट प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर इंधनाची बचत, वायूप्रदूषण कमी करण्यात मोठी मदत होणार आहे. तूर्तास एपीएम टर्मिनल्स आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यातील हा संयुक्त उपक्रम असल्याची माहिती जेएनपीए अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली आहे.

जेएनपीए बंदरात अद्ययावत अशी सहा खासगी बंदरे आहेत. या सहा बंदरांमध्ये १२ ते १५ हजार कंटेनर वाहतूक क्षमतेची एकाचवेळी ३० मालवाहू जहाजे लागण्याची क्षमता आहे. कंटेनर मालाची चढउतार करण्यासाठी बंदरात तासनतास ही जहाजे बर्थवर उभी ठेवली जातात. यादरम्यान बर्थवर असताना, जहाजातील हॉटेलिंग, अनलोडिंग आणि लोडिंग यासारख्या अत्यावश्यक सेवा चालवण्यासाठी जहाजे  काही बेस लोड विजेचा वापर करतात. यासाठी विजेची आवश्यकता असते.

प्रदूषण कमी होऊन इंधनाचा खर्च वाचणार

  • जहाजाच्या क्षमतेनुसार १००० ते २५००० केव्हीए इतक्या प्रचंड क्षमतेच्या एचटी, एलटी दोन-तीन विद्युत जनित्रांचा वापर केला जातो. मालाची चढउतार करण्यासाठी २४ ते ४८ किंवा कधीकधी त्याहूनही अधिक तास लागतात. 
  • यादरम्यानच्या काळात विद्युत जनित्रांना सहा ते नऊ टन लिटर्स  डिझेल (६००० ते ९००० हजार लिटर्स) लागते. या दोन दिवसांसाठी पावणेसहा ते पावणेनऊ लाख रुपये खर्ची पडतात. जनित्रांवर मोठ्या प्रमाणावर इंधनाचा वापर होतो. यामुळे जनित्रांतून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषण वाढते. 
  • विजेसाठी इंधनावरही खर्च होत आहे. यावर उपाय म्हणूनच बंदरातील किनारपट्टीवरील जहाजांसाठी ही पायलट योजना राबविण्याचा पर्याय पुढे आल्याची माहिती जेएनपीएचे एम ॲंड ईई विभागाचे मुख्य व्यवस्थापक नितीन बोरवणकर यांनी दिली.

जेएनपीए बंदरात बर्थवर उभ्या असलेल्या जहाजांना किनाऱ्यावरील ऊर्जा पुरवण्यासाठी १०० कोटी खर्चाचा देशात कार्यान्वित होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. साधारणत: दीड वर्षात तो कार्यान्वित होईल. बंदरावरील जहाजावरील विद्युत पुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जनित्रांवर मोठ्या प्रमाणावर होणारा डिझेलचा वापर आणि वायुप्रदूषण कमी करण्यासाठी त्याची मदत होणार आहे. बंदरातील सर्वच टर्मिनल्सवर ही सुविधा वाढवली, तर राष्ट्रीय ग्रीडपासून बंदरात येणाऱ्या सर्वच जहाजांना किनाऱ्यावरील वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. यासाठी एकूण ७४ मेगावॅट वीज आवश्यक आहे. - उन्मेष वाघ, अध्यक्ष-जेएनपीए

टॅग्स :JNPTजेएनपीटी