शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
4
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
5
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
6
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
7
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
8
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
9
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
10
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
11
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
12
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
13
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
14
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
15
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
16
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
17
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
18
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
19
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
20
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड

कोरोना काळात बालविवाह प्रमाण वाढले, माता आणि बाल मृत्यूंमध्ये ३५ टक्क्क्यांनी वाढ - रुपाली चाकणकर 

By राजेश भोस्तेकर | Published: September 16, 2022 1:37 PM

Rupali Chakankar: कोरोना काळात बालविवाह करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कमी वयात मुलींना बाळंतपण सोसावे लागले आहे. त्यामुळे माता आणि बाळ मृत्यू प्रमाण ३५ टक्याने वाढले आहे. ही एक गंभीर बाब आहे. त्याचबरोबर अंधश्रध्देनेही विळखा घातला आहे.

- राजेश भोस्तेकरअलिबाग -  कोरोना काळात बालविवाह करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कमी वयात मुलींना बाळंतपण सोसावे लागले आहे. त्यामुळे माता आणि बाळ मृत्यू प्रमाण ३५ टक्याने वाढले आहे. ही एक गंभीर बाब आहे. त्याचबरोबर अंधश्रध्देनेही विळखा घातला आहे. त्यामुळे बालविवाह रोखणे आणि अंधश्रध्देच्या जोखडातून समाजाला बाहेर काढणे हे उद्दिष्ट असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाषणातून मत व्यक्त केले आहे.

महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे राज्य महिला आयोगा मार्फत जनसुनावणी सुरू आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी बालविवाह, माता आणि बाळ मृत्यू, अंधश्रद्धाबाबत माहिती दिली. महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत जनसुनावणी व शासकीय विभागांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सदस्य सचिव श्रद्धा जोशी, गौरी छाब्रिया, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर , राजीप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, पोलिस अधीक्षक अशोक दुधे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, विधी प्राधिकरण सचिव अमोल शिंदे हे उपस्थित आहेत.

कोरोना काळात कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे मुलीचे लग्न लावून देण्याचा पायंडा ग्रामीण भागात घातला गेला आहे. त्यामुळे बालविवाह आणि अंधश्रद्धा रोखणे हे आपल्यासमोर उद्दीष्ट असल्याचे रुपाली चाकण कर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकरRaigadरायगड