शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची

By admin | Published: August 18, 2015 2:53 AM

जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची लोकचळवळ यशस्वी होत आहे. गावाने एकजुटीने स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम केल्यामुळे आज हा कार्यक्रम पार पडला.

अलिबाग : जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची लोकचळवळ यशस्वी होत आहे. गावाने एकजुटीने स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम केल्यामुळे आज हा कार्यक्रम पार पडला. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. या गावाची स्वच्छतेतील कामगिरी कौतुकास्पद आहे,असे प्रतिपादन म्हसळा गटविकास अधिकारी नीलिमा गाडे यांनी केले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित हागणदारीमुक्ती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.‘घर तिथे शौचालय’ ही संकल्पना साकारत असलेल्या म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील तज्ज्ञ व गावातील सरपंच, पदाधिकारी, व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित हागणदारीमुक्ती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल - ताशांच्या गजरात व स्वच्छतेच्या घोषणा देत विद्यार्थी व शिक्षक, ग्रामस्थ यांनी समाजमंदिरापासून प्रभात फेरी काढली. हागणदारीमुक्तीचा बॅनर व स्वच्छतेच्या घोषणांचे फलक हातात घेवून संपूर्ण गावात हा जल्लोष करण्यात आला. मंदिरासमोर स्वच्छतेची शपथ देण्यात आली. प्राथमिक शाळेत सरपंच रेखा भायदे व गटविकास अधिकारी नीलिमा गाडे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. स्वच्छतेत सातत्य ठेवणे व शौचालयाच्या वापराबरोबरच घनकचरा व्यवस्थापनाला प्राधान्य द्यावे,असे आवाहन यावेळी बोलताना रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी केले. यावेळी संवादतज्ज्ञ सुरेश पाटील व दिलासा फाउंडेशन अध्यक्ष किरण शिरगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विस्तार अधिकारी डी.एस.दिघीकर, उपसरपंच प्रकाश लोणशीकर, जि.प.चे मनुष्यबळ विकास सल्लागार आनंद धिवर, समाजशास्त्रज्ञ रविकिरण गायकवाड, स्वच्छता तज्ज्ञ सुशांत नाईक, मुख्याध्यापक आर.बी. सावंत आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)