शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
3
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
4
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
5
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
6
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
7
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
8
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
9
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
10
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
11
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
12
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
13
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
14
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
15
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
16
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
17
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
18
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
19
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
20
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

ममदापूर ग्रामपंचायतीचे डम्पिंग ग्राउंड बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 12:24 AM

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : उल्हास नदीकाठावर कचऱ्याचा ढीग

नेरळ : कर्जत तालुक्यातून वाहत जाणाºया उल्हास नदीतून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दिवसेंदिवस उल्हास नदीचे पाणी दूषित होत आहे, अनेक गावे शहराचे सांडपाणी, जलपर्णी तर उल्हास नदीत टाकला जाणारा कचरा यामुळे परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. ममदापूर ग्रामपंचायतीने देखील ग्रामपंचायत हद्दीत जमा झालेला कचरा उल्हास नदीच्या काठावर टाकण्यास सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात हा कचरा नदीत जाण्याची शक्यता असल्याने हे डम्पिंग ग्राउंड बंद करावे यासाठी स्थानिकांनी सह्यांची मोहीम राबविली असून हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.

ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत जमा झालेला कचरा येथील कर्मचारी गोळा करून घंटागाडीमधून उल्हास नदीच्याकाठी टाकत आहेत. उल्हास नदीच्या पाण्यावर तालुक्यातील शेलू, वांगणी, बदलापूर येथे अनेक पाणी योजना अवलंबून आहेत. तरी सुद्धा अनेक शहरातील सांडपाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस उल्हास नदीत जलपर्णी निर्माण होते आणि परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे.

ममदापूर ग्रामपंचायतीने देखील डम्पिंग ग्राउंड पेशवाई रस्त्यावर नदीच्या काठावर सुरू केले आहे. यामुळे पावसाळ्यात हा कचरा पाण्याच्या प्रवाहात नदीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड तत्काळ हलविण्यात यावे, यासाठी ग्रामस्थ राम हिसाळगे व अन्य ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम देखील राबविण्यात आली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी रायगड, नेरळ ग्रामपंचायत, नेरळ पोलीस स्टेशन यांना दिले आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड लवकरात लवकर हलविण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे.