कर्जत : तालुक्यातील आंबोट येथील एका ग्रामस्थाने मला गावकीने वाळीत टाकले आहे, अशी तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात केली आहे. जयवंत धर्मा मसणे (३३) यांनी मला एक वर्षापासून गावातील ७३ लोकांनी आपापसात संगनमत करून माझ्या कुटुंबासोबतबोलायचे नाही, तसेच माझ्या शेतावर कोणी कामावर जायचे नाही, असे सांगून बहिष्कृत करून वाळीत टाकले आहे, अशी तक्रार दाखल केली आहे. कर्जत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे तपास करीत आहेत. या प्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आली नसून, प्रकरणाची शहानिशा झाल्यावरच कारवाई होईल असे ढवळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
वाळीत टाकल्याप्रकरणी कर्जतमध्ये तक्रार दाखल
By admin | Published: October 14, 2016 2:29 AM