शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
2
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
3
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
4
पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत
5
छोट्या घटक पक्षांना हव्यात अधिक जागा; मविआ जागावाटपाचा विषय लांबला 
6
बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट 
7
युद्धाचा भडका; सोन्याचा भाव ७७ हजार ९०० रुपयांवर, जीएसटीसह किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या
8
सिद्दिकी हत्याकांड प्रकरण, पाच जणांना अटक
9
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
10
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
11
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
12
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
13
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
14
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
15
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
16
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
17
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
18
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
19
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
20
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक

शेतीच्या कामांना वेग आल्याने साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:22 AM

रायगडमध्ये बळीराजा लागला कामाला : मशागतीची कामे अंतिम टप्प्यात, हातउसने पैसे घेऊन बी-बियाण्यांची केली खरेदी

अलिबाग : सुरुवातीला कोरोनाचे सावट आणि नंतर निसर्ग चक्रीवादळाने दिलेला तडाखा असे दुहेरी संकट रायगडवर ओढवले होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील नागरिक स्थिरस्थावर होण्यासाठी अद्यापही चाचपडत आहेत. मात्र, शहरातील नागरिक पावसापासून रक्षण करण्यासाठी कामाला लागले आहेत. घराच्या डागडूजी बरोबरच शेतीच्या कामांना आता वेग आला आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे.मान्सून अगदी तोंडावर आल्यामुळे शेतकऱ्यांना खरीपाचे वेध लागल्याने मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे शेतांमध्ये वर्दळ पाहायला मिळत आहे.

एकीकडे मार्च महिन्याच्या अंतिम टप्प्यात टाळेबंदी झाल्याने सर्वत्र शांतता होती. सरकारने खरीपपूर्व शेतीकामांना शिथिलता दिल्यानंतर पेरणीपूर्व नांगरणी, सपाटी अशी कामे सुरू झाली होती. मात्र, कोरोनाचे सावट असल्याने मजूर ही भेटणे अशक्य झाले होते. बाजारपेठेत शेतीच्या अवजारास बियाणांच्या खरेदीला गेल्यावर एकाच ठिकाणी वस्तू मिळाली नसल्याने शेतकºयांची ससेहोलपट झाली होती. मागील बुधवारी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसल्यामुळे शेतीकामाची गती मंदावली होती. मात्र, आता मंगळावारपासून पुन्हा वेगाने सुरू झाली आहेत.जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालून खरीपाच्या तोंडावर पीककर्ज उपलब्ध करून दिल्यास शेतकºयाला मोठा आधार होणार आहे. त्यातच वादळामुळे काही ठिकाणी नुकसान झाल्याने शेतकºयांसमोर अनेक अडचणी उभ्या आहेत. आज सर्व उद्योग अडगळीत असताना शेती उद्योग सुरू आहे. मात्र अचानक निसर्ग वादळाच्या फटक्याने शेतकरी राजाचे खच्चीकरण झाले आहे.एकीकडे पडझड झालेल्या घरांची डागडूजी करण्यासाठी बाजूला ठेवलेले पैसे खर्च करावे लागत आहे. येणाºया पावसापासून आपला व आपल्या घरांचा बचाव करण्यासाठी त्यांना संरक्षण देण्यासाठी मेणकापड, ताडपत्री खेरीदी करताना दिसत आहेत. काहींनी हात उसणे पैसे घेऊन बी-बीयाण्यांची खरेदी केली असून निसर्ग वादळाचा तडाखा बसल्याने पुन्हा एकदा मशागतीच्या कामांना मंगळवार पासून मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे.मान्सून दाखल झाल्यावर फळझाड लागवडीला वेगदरवर्षी मान्सून येण्यापूर्वी शेतकरी फळबाग लागवडीसाठी नियोजन करायचे.मात्र वादळामुळे फळबाग लागवड ठप्प झाली आहे. नर्सरी तसेच विविध रोपवाटिकांमध्ये अद्यापही कलम व रोप तेथेच पडून आहेत. चांगल्या वाढ झालेल्या अवस्थेत या रोपांची व कलमांची विक्र ीही रखडलेली आहे. त्यामुळे याचा फटका रोपवाटिका विक्रेत्यांनाही बसलेला आहे. विविध प्रकारची कलमे व रोपे चांगल्या वाढ झालेल्या अवस्थेत आली असून ती परिपक्व होऊन विक्र ीच्या प्रतीक्षेत आहेत. मान्सून दाखल झाल्यानंतर फळझाड लागवडीसाठी वेग येणार असल्याचे रोपवाटिका विक्र ेत्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग