निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाचा ताफा स्थानिकांनी रोखला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 07:15 PM2020-06-16T19:15:03+5:302020-06-16T19:15:26+5:30

सदर पथक अलिबाग,नागाव,चौलहून बोर्ली आणि  काशिद या भागातील नुकसानीचा आढावा घेऊन नांदगावमार्गे मुरुड शहराकडे रवाना होणार होते

Cyclone Nisarga: The locals stopped the central team from inspecting the damage caused | निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाचा ताफा स्थानिकांनी रोखला

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसानीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाचा ताफा स्थानिकांनी रोखला

Next

आविष्कार देसाई

अलिबाग: काेकणात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाचा ताफा स्थानिकांनी आज राेखला. अलिबाग तालुक्यातील नागाव आणि मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील नागरिकांच्या राेषाला पथकाला सामाेरे जावे लागले आहे. आमचे म्हणणे ऐकून घ्या नंतरच पुढे जा असा पवित्रा त्यांनी घेतल्याने तेथे काही काळ तणाव निर्माण झाल हाेता.

सकाळी 10 वाजता अलिबाग मांडवा जेट्टी येथे राेराे सेवेने आगमन झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बैठक घेतल्यानंतर ते प्रत्यक्ष पाहणीसाठी निघाले. सुरुवातीला अलिबाग नागाव येथील पडझड झालेल्या एका खासगी शाळेची पाहणी केली. त्यानंतर चाैलकडे पथक जात असतानाच वाटेत विजेचे पाेल बसवण्याचे काम सुरु हाेते. ग्रामस्थांच्या मदतीने महावितरणचे काम करत हाेते. त्यामुळे रस्ता पूर्णतः बंद झाला हाेता. केंद्रीय पथकाचा ताफा चालला आहे. रस्ता माेकळा करा असे पाेलिस अधिकाऱ्यांनी संबंधीतांना सांगितले. तेव्हा ग्रामस्थ नाराज झाले. गेले 15 दिवस गावात लाईट नाही, पाणी नाही असे सांगत गाेंधळ घातला. त्यानंतर प्रांताधिकारी शारदा पाेवार यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर रस्ता माेकळा करण्यात आला. तसेच केंद्रीय पथक नुकसानग्रस्त नारळ सुपारीसह अन्य फळांच्या बागांची पहाणी न करता परस्पर निघुन जात हाेते. त्यावेळी नांदगावमधील बागायतदारांनी त्यांचा रस्ता राेखला आणि आपल्या व्यथा पथकासमाेर मांडल्या.

सदर पथक अलिबाग,नागाव,चौलहून बोर्ली आणि  काशिद या भागातील नुकसानीचा आढावा घेऊन नांदगावमार्गे मुरुड शहराकडे रवाना होणार होते. नांदगावमधील केवळ बागायतींची पहाणी ते करणार होते. परंतु सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे सदर पथकातील सदस्यांना नियोजित स्थळी वेळेत पोचता आले नाही. त्यामुळे आधीच वाट पाहून कंटाळलेल्या बागायतदारांना डावलून मुरुडकडे रवाना होणाऱ्या या पथकाला नांदगावच्या बागायतदारांनी रस्त्यातच राेखले आणि आपले म्हणणे ऐकण्यास भाग पाडले. रमाकांत खोत यांच्या बागायती जवळ नांदगावचे उपसरपंच अस्लम हलडे,पंकज दळवी विशाल चोरघे,श्रद्धा गद्रे,उदय खोत,सतिश देशपांडे,विलास ठोसर,रमेश चौलकर,सचिन खोत आदींनी पथकाच्या गाड्यांसमोर उभे राहून आपल्या नुकसानीचा पाढाच वाचला. कोकणासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. सदर मदत तातडीने देण्यात यावी असेही त्यांनी या वेळी पथकातील सदस्यांना सांगितले. त्यानंतर हे पथक श्रीवर्धनकडे रवाना झाले. 17 जूनला केंद्रीय पथक महाडहून रत्नागिरीकडे प्रयाण करुन दिवसभर तेथील नुकसानीची पाहणी करणार आहे. 18 जून राेजी दापाेलीहून सकाळी लवकर निघून ते मांडवा जेट्टी येथून राे-राे सेवेने मुंबईला रवाना हाेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

केंद्र सरकारने नेमलेल्या या पथकाचे प्रमुख रमेश कुमार गांता ( संयुक्त सचिव) हे आहेत. त्याचबराेबर त्यांच्या पथकामध्ये बी.के.काैल (संचालक, अर्थमंत्रालय, नवी दिल्ली), एन.आर.एल.के.प्रसाद (संचालक, उर्जा मंत्रालय नवी दिल्ली), एस.एस.माेदी (उपसचिव, ग्रामिण विकास, मंत्रालय, नवी दिल्ली), आर.पी.सिंग. (संचालक, कृषीमंत्रालय, नागपूर) आणि अनशूमाली श्रीवास्तव ( मुख्यअभियंता, रस्ते,वाहतुक, महामार्ग, मुंबई) यांचा समावेश आहे.

Web Title: Cyclone Nisarga: The locals stopped the central team from inspecting the damage caused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.