शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हापूस आंब्याच्या उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:57 IST

शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची बागायतदारांची मागणी

अलिबाग : जिल्ह्यात चालू वर्षात उच्च तापमान, बदलते हवामान आणि अवेळी पडणारा पाऊ स अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हापूस आंब्याच्या उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट झाल्याने, आंबा उत्पादक बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे शासकीय स्तरावर सर्वेक्षण होऊन नुकसानग्रस्त आंबा बागायतदार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आंबा बागायतदारांकडून होत आहे.

आंब्याच्या उत्पादनाकरिता फवारणी, औषधे, मनुष्यबळ आदी सर्व खर्च मोठा होत असून, त्या प्रमाणात यंदा आंबा उत्पादन मिळालेले नाही. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना ३५ ते ४० टक्के आंबा हाती लागला आहे. अशीच अवस्था राहिल्यास आंबा बागाईतदार भुईसपाट होईल. तो होऊ नये यासाठी शासनाने आंबा उत्पादकांना सहकार्य करावे, अशीही अपेक्षाही भुवनेश्वर येथील आंबा बागायतदार तथा कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्थांचे संचालक डॉ. जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केली आहे. बदललेल्या हवामानामुळे तसेच वारंवार पडलेल्या थंडीमुळे या वर्षी आंब्याचा मोहर गर्भावस्थेत असताना कमी झाला. परिणामी, आंब्याची धारणा कमी झाल्याने उत्पादकता खाली आली. आंबा उत्पादन कमी असल्याने पर्यायाने त्यावर आधारित शेतमजूर, खोके बनवणारे, वाहतूक व्यवसायदार, यांच्यावर विपरित परिणाम झाल्याचे पाटील यांनी सांगितले.आंबा नुकसानाचा अहवाल शासनास पाठवणारच्हवामानातील सततच्या बदलामुळे जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादनात यंदा सुमारे ६० टक्के घट झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आंबा उत्पादक शेतकºयांचे अल्प उत्पन्न वा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये त्याचबरोबर नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळावी, याकरिता कृषी विमा योजना शासनाने उपलब्ध करून दिली आहे. ज्या शेतकºयांनी हा पीक विमा घेतला आहे आणि ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना विमा योजनेनुसार नुकसानभरपाई मिळेल. दरम्यान, आंबानुकसानाबाबतचा अहवाल शासनास पाठविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी दिली आहे.