शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

कालव्यातून हेटवणे सिंचनाचे पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 12:58 AM

पेणमधील शेतकरी समाधानी; रब्बी हंगामाच्या कामाची लगबग सुरू

पेण : हेटवणे धरणाच्या ओलिताखाली येणाऱ्या १७०० एकर क्षेत्रावर रब्बी हंगामाच्या कालावधीत पिकणाºया भातशेतीसाठी कालव्यातून हेटवणे सिंचनाचे पाणी सोडले आहे. या परिसरातील जमीन पाण्याखाली आली असून, या दोन-चार दिवसांत भात पेरणीला प्रारंभ होणार आहे. यावर्षी नववर्षाच्या मुहूर्तावर पाणी सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांची कामे थोडीफार बाकी राहिली होती. ती आटोपताच शेतीसाठी पाणी सोडण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सध्या पेण शहरात व ग्रामीण भागात गुलाबी थंडी जाणवू लागली आहे, अशा थंडीत शेतीसाठी पाणी सोडल्याने सायंकाळी व रात्री वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला आहे. हा गारवा आंबा व इतर फळ उत्पादनासाठी आवश्यक असतो, त्यामुळे आंबा मोहोर ताटवे फुलू लागतील. शेतजमिनीत पाणी साचल्याने एकंदर गुलाबी थंडी अधिक जाणवत आहे. सकाळी या परिसरात धुक्याची दुलई पसरते. त्यामुळे दैनंदिन कामे सूर्यप्रकाश अर्थात उन्हे पडल्यावर सुरू होत नाहीत. सध्या या परिसरात बगळे व इतर पक्ष्यांच्या आगमनाने पक्षिगणांचा किलबिलाट ऐकू येतो. शेतकरी ओल्या चिखल मातीमध्ये नांगरणी करून ओलितावर भात बियाणे भिजवून पेरणीकरून हिरवे तृणपात्याची उगवण करेल.पुढील १५ ते २० दिवस रब्बीच्या हंगामाच्या कामात शेतकरी व्यस्त राहणार असून, खरीप हंगामातील पिकांना जो फटका बसला होता, ती कसर रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करेल. उन्हाळ्यातील भातशेतीला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो, याबरोबर मुबलक पाणी व खतांची मात्रा पिकांना मिळते. खात्रिशीर उत्पन्नाची हमी व पिकांवर रोगराईची भीती नसल्याने शेतकरी सिंचनाच्या पाण्यावर होणाºया शेतीसाठी नेहमीच उत्सुक व आनंदी असतो.सिंचनाचे पाणी एप्रिल २०२० पर्यंत गरजेनुसार सोडण्यात येणार आहे. शेतकºयाची जशी मागणी असते, तसतसे पाणी कमी-जास्त प्रमाणात सोडण्यात येत असते, अशी माहिती प्रकल्प सूत्रांनी दिली. एकूणच सिंचनाचे पाणी जमिनीत सोडण्यात आल्याने येत्या महिन्याभरात येथील शिवारात शेतकरी व मजुरांची लगबग दिसून येईल. संपूर्ण शिवारात हिरवाईचा गालिचा पसरलेला दिसेल आणि येथील वातावरण प्रफुल्लित राहील.