शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८४.९७ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:18 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी सकाळी ऑनलाइन जाहीर झाला.

अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी सकाळी ऑनलाइन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८४.९७ टक्के लागला असून जिल्ह्यात उत्तीर्ण विद्यार्र्थ्यांमध्ये गतवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. विभागवार निकालामध्ये राज्यात कोकण विभागाचा निकाल ९३.२३ टक्के लागून कोकण विभाग अव्वल ठरला आहे.जिल्ह्यात सर्व शाखांच्या एकूण ३०,८३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी ३०,८०१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत १२६०, प्रथम श्रेणीत ६१७२, द्वितीय श्रेणीत १६,५५३ तर उत्तीर्ण श्रेणीत २१८८ असे ८४.९७ टक्के म्हणजे एकूण २६,१७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ७७.३२ टक्के मुले तर ८९.९९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९०.३० टक्के लागला आहे. उर्वरित शाखांमध्ये कला शाखा ७२.७२ टक्के, वाणिज्य शाखा ८९.२८ टक्के तर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्र म ७७.८२ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत एकूण १०,१३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते, त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेस १०,१२७ बसले. त्यापैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत ४१८, प्रथम श्रेणीत २०६७, द्वितीय श्रेणीत ६१८१ तर उत्तीर्ण श्रेणीत ४८२ असे ९०.३० टक्के म्हणजे एकूण ९१४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कला शाखेत एकूण ८१६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेस ८१४१ बसले त्यापैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत ६५, प्रथम श्रेणीत ८४९, द्वितीय श्रेणीत ४२३७ तर उत्तीर्ण श्रेणीत ७६९ असे ७२.७२ टक्के म्हणजे एकूण ९१४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.वाणिज्य शाखेत एकूण ११,८०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेस ११,७९८ बसले. त्यापैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत ७५८, प्रथम श्रेणीत ३०२८, द्वितीय श्रेणीत ५८२५ तर उत्तीर्ण श्रेणीत ९२२ असे ८९.२८ टक्के म्हणजे एकूण १०,५३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्र म शाखेत एकूण ७३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेस सर्व ७३५ बसले. त्यापैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत १९, प्रथम श्रेणीत २२८, द्वितीय श्रेणीत ३१० तर उत्तीर्ण श्रेणीत १५ असे ७७.८२ टक्के म्हणजे एकूण ५७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याच्या तालुकानिहाय निकाल टक्केवारीत माणगाव तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९०.५९टक्के तर सर्वात कमी ७३.६९ टक्के निकाल खालापूर तालुक्याचा लागला आहे.>आयडियल इंग्लिश स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायमन्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज म्हसळाचा कला विभागाचा निकाल ६७.२१ टक्के लागून दीपक वतारे ७३.८४ टक्के (प्रथम), परशुराम मांडवकर ७२.१५ टक्के (द्वितीय)तर अलिशा जाधव ६८.६९ टक्के (तिसरी) आली आहे. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९९.३८ टक्के लागला असून संदेश बोर्ले ८४.३०टक्के (प्रथम), सूरज आंग्रे ८३.२३ टक्के (द्वितीय)आणि मीनाक्षी जैन ८१.६९ टक्के (तिसरी)आली.अंजुमन-इ-इस्लाम जंजिरा कला,विज्ञान आणि वाणिज्य ज्युनिअर कॉलेज म्हसळा येथील विज्ञान शाखेतून बशरा मन्सुर शिर्शिकार हिने ७४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, यासर मुसद्दीक इनामदार याने ७३.२३ टक्के गुण मिळवून दुसरा तर ७३.०७ टक्के गुण मिळवुन फरीन मुकादम हिने तिसरा क्रमांक पटकावला.आयडियल इंग्लिश स्कूल म्हसळा यांनी १०० टक्के निकाल लावण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवली असून हुदा काळोखे हिला ८२.७६ टक्के गुण मिळून प्रथम, सिद्रा काझी हिला ७८.७६ टक्के गुण मिळून दुसरी तर युसूफ दामाद यास ७५.८४ टक्के गुण मिळून तिसरा क्रमांक पटकावला.मौलाना आझाद हायस्कूल पांगळोली येथून हवा फवाज एजाज यास ७१.५३ टक्के गुण मिळून प्रथम, ताहरीन म.इशाक ६८.४६ गुण मिळवून दुसरी तर निडा अस्लम धनशे हिस ६८ टक्के गुण मिळून तिसरा क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी जमीर कादिरी, समीर बनकर, नसीर मिठागरे, फझल हालडे, बी.एन.माळी, याकूब खान आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन के ले.>नेताजी पालकर विद्यालयाचा निकाल ७३.५८ टक्केमोहोपाडा : चौक येथील यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल ७३.५७ टक्के लागला आहे.या कनिष्ठ महाविद्यालयात कला व वाणिज्य या दोन शाखा १२ वीपर्यंत आहेत.कला शाखेचा ६४.१७ टक्के तर वाणिज्य शाखेचा ८२.१९ टक्के निकाल लागला असून दोन्ही शाखेतून १४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.वाणिज्य शाखेतून सानिया दिवाण ७६.१५ टक्के, माधुरी राणे ७१.३८ टक्के, निशा पवार ६९.२३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आल्या. कला शाखेतून अनिकेत भालेकर ६७.३८ टक्के, प्राची मुकादम ६४.६१ टक्के, अस्मिता डुकरे ५८.९२ टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले. प्राचार्य देवळे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.>पनवेलमध्ये टक्का वाढलापनवेल तालुक्यातील व्ही. के. हायस्कूल विज्ञान शाखेचा ९२.५४ टक्के, कला शाखेचा ७५.५४ टक्के तर वाणिज्य शाखेचा ९१.८४ टक्के निकाल लागला आहे. चांगू काना ठाकूर विज्ञान शाखेचा ९७. ६५ टक्के, कला शाखा ९६.६१ टक्के, वाणिज्य शाखेचा ९६.३९ टक्के निकाल लागला आहे. बांठिया माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला.