शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल
2
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
3
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
4
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
5
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
6
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
7
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
8
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
9
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
10
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
11
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
12
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
13
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
14
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
15
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
16
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
17
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
18
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
19
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
20
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद

खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण

By admin | Published: August 13, 2016 4:02 AM

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास दिवसेंदिवस त्रासदायक आणि धोकादायक ठरत आहे. महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामामुळे नाहक जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर

कार्लेखिंड : मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास दिवसेंदिवस त्रासदायक आणि धोकादायक ठरत आहे. महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामामुळे नाहक जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर अक्षरश: खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून भरण्यात आलेले खड्डे पुन्हा तयार होत आहे. तेथे टाकण्यात आलेली माती आणि खडी पुन्हा खड्ड्यांच्यावर आल्यामुळे रस्ता खाली, वर झाला आहे. त्यामुळे वाहनांची गती मुंगीच्या चालीसारखी झाली आहे. दररोज या महामार्गावरु न लाखो वाहने प्रवास करतात,यामुळे सकाळपासून वाहतूक कोंडी होत असते. खड्डे असल्यामुळे एखादे अवजड वाहन बंद पडते, हे प्रकार आता नित्याचाच झाला आहे. यामुळे कर्मचारीवर्ग, शाळा, कॉलेजातील विद्यार्थी तसेच याच मार्गावरून दर दहा मिनिटांनी जाणारी रुग्णवाहिका अडकून राहते हे आता नित्याचे होत आहे. त्यामुळे हा प्रवास त्रासदायक ठरत आहे. ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्या ठिकाणी ठोकळे लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी होत आहे. मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी वाहकाला कसरत करावी लागत आहे. त्यामध्ये काहीना काही अपघातांची मालिका सुरु आहे. वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याकरिता वाहतूक पोलिसांवर ताण पडत आहे. या महामार्गाच्या दयनीय अवस्थेमुळे अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून येत आहे. अख्ख्या उन्हाळ्यात या मार्गावर कोणत्याही प्रकारचे काम करण्यात न आल्यामुळे यावर्षी जास्त त्रास सहन करावा लागला आहे. सध्याच्या परिस्थितीला होणारा खर्च हा उन्हाळ्यात करु न मार्ग सुस्थितीत केला असता तर त्यापेक्षा खर्च कमी झाला असता असा सूर जनतेतून उमटत आहे. गणेशोत्सव काळात काय होईल याचा विचार करुन कोकणवासीय त्रस्त होत आहेत. बुधवारी परिवहन मंत्री यांनी २५ आॅगस्टपर्यंत महामार्गावरील खड्डे भरण्याचे सुचविले आहे. (वार्ताहर)