शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

मेळाव्यातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न

By admin | Published: October 05, 2016 3:01 AM

शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत काही दिवसांपूर्वी महिला सक्षमीकरणासाठी संपूर्ण राज्यात सप्ताह साजरा केला. यात महसूल विभागाने विविध उपक्रम राबविले.

जयंत धुळप, अलिबागशासनाच्या महसूल व वन विभागामार्फत काही दिवसांपूर्वी महिला सक्षमीकरणासाठी संपूर्ण राज्यात सप्ताह साजरा केला. यात महसूल विभागाने विविध उपक्र म राबविले. मेळाव्यांचे आयोजन करून महिला सक्षमीकरणाबाबत प्रयत्न केले. यामार्फत प्रामुख्याने महिलांचे मनोबल वाढविणे, महिलांविषयी असलेल्या योजनांची माहिती देणे,त्यांना सक्षम होण्यासाठी अवगत करणे या बाबींवर भर देण्यात आला. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण कोकण विभागात झालेले महिला सक्षमीकरणाचे उपक्र म, मेळावे हे माता-भगिनींच्या सबलीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.संपूर्ण कोकण विभागात या उपक्र मांना फार मोठ्या संख्येने महिलांचा प्रतिसाद लाभला. कोकण विभागात या कालावधीत ३,४०८ विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले. तर प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत ९,७५५ बचत खाती नव्याने उघडण्यात आली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत १,५६,४६० व्यक्तींचा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत २६६५ आणि अटल पेन्शन योजनेत १,३४३ व्यक्तींचा नव्याने समावेश करण्यात आला. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत ३७३ व्यक्तींना लाभ देण्यात आला. माझी कन्या भाग्यश्री योजनेत ३१९ प्रकरणे शोधण्यात येऊन त्यापैकी १९४ प्रकरणात लाभही देण्यात आला. तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत मोहीम कालावधीत दाखल झालेल्या ५४ प्रकरणांपैकी ४३ प्रकरणात मदत देण्यात आली. मनोधैर्य योजनेअंतर्गत २४ प्रकरणातील पीडितांना लाभ देण्यात आला. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत १,७०३ लाभार्थ्यांचा शोध घेण्यात आला. मोेहीम कालावधीत महिलांसाठी १,३८२ आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्याचा ३६,६१५ महिलांनी लाभ घेतला.लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत मोहीम कालावधीत १,२८० महिलांची नावे त्यांच्या पतीच्या नावासमवेत सहहिस्सेदार म्हणून भोगवटादार दाखल केली. तसेच डिजिटल इंडिया या योजनेअंतर्गत एक लाखापेक्षा जास्त महिलांनी आपली डिजिटल लॉकर्स उघडली. असे महत्वाचे कार्य या मोहीम कालावधीत संपूर्ण कोकण विभागात झाले.रायगड जिल्ह्यातील लाभार्थीजिल्ह्यात ९९७ ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या. त्याठिकाणी जवळपास ४० हजार ८०० महिलांची उपस्थिती होती. तर जिल्ह्यातील १ हजार ८१८ कुटुंबाचे पंतप्रधान जन-धन योजनेत बचत खाते उघडण्यात आले. २ हजार २६५ पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचे तर ३४१ पंतप्रधान जीवन ज्योती योजनेचे लाभार्थी झाले. २५९ अटल पेन्शन योजनेचे लाभार्थी या काळात झाले .त्याचप्रमाणे राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्र मांतर्गत राष्ट्रीय वृध्दावस्था निवृत्ती योजनांची ४२४ प्रकरणे करण्यात आली.८४ प्रकरणे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी तसेच १८६ प्रकरणे राष्ट्रीय मातृत्व लाभ योजनेसाठी या काळात झाली. महत्वाच्या अशा प्रधानमंत्री मुद्रा योजनेत १०७ लाभार्थी, माझी कन्या भाग्यश्री योजनेत २८७ लाभार्थी या काळात झाले.महिला व बाल विभागाच्या योजनामहिला सक्षमीकरणासाठी केवळ शिबिरे, अथवा विशेष सप्ताहाचे आयोजन नसून महिला व बाल विकास विभागामार्फत सातत्याने वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. यात प्रामुख्याने एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आय.सी.डी.एस.), किशोरी शक्ती योजना, राजीव गांधी सबला योजना, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना, काम करणाऱ्या महिलांच्या मुलांकरिता राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना, बलात्कार पीडित, लैंगिक शोषण पीडित बालक आणि हल्ला पीडितांकरिता मनोधैर्य योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, बाल संगोपन योजना म्हणजे मुलांसाठी कौटुंबिक देखभाल, बाल सल्ला केंद्र, निराश्रित महिलांसाठी आधार गृहे, अत्याचारग्रस्त पीडित महिलांसाठी सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला केंद्र, महिला समुपदेशन केंद्र, शुभमंगल सामूहिक विवाह योजना.