शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

कर्मचाऱ्यांनी भागविली वाड्यांची तहान

By admin | Published: March 30, 2017 6:49 AM

कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी उन्हातान्हात

नेरळ : कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी उन्हातान्हात डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करीत दोन ते तीन किमी अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आदिवासींना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. एलआयसी कंपनीच्या कर्मचारी संघटनेने दोन आदिवासी वाड्यांत पाण्याचे टँकर सुरू केल्याने आदिवासी बांधवांची तहान भागली आहे.कर्जत तालुक्यातील बांगरवाडी ही आदिवासीवाडी खांडस ग्रामपंचायतीत येत असून, खांडस येथील पाझर तलावात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असताना तलावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाडीतील विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे ४५ घरांची वस्ती असलेल्या त्या वाडीतील आदिवासी महिलांना खांडस गावाला जाणाऱ्या डांबरी रस्त्याने डोक्यावर हंडे घेऊन जाण्याची वेळ आली आहे. अगदी ५० मीटरवर मुबलक पाणी असलेल्या ताडवाडी परिसरात असलेल्या आदिवासी लोकांच्या घरातील हंड्यात पाणी नाही. पाण्यासाठी त्या वाडीतील महिला तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वारे गावाकडील नाल्यावर पोहचतात. तेथील महिलांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असून एप्रिल महिना सुरू होण्याअगोदर ही स्थिती निर्माण झाल्याने आदिवासी भागातील महिलांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.गेली काही वर्षे आयुर्विमा महामंडळाचे कर्मचारी ठाणे येथील कार्यालयात काम करणारे अधिकारी, कर्मचारी पाणीटंचाईग्रस्त भागात आदिवासींची तहान भागविण्याचे प्रयत्न करत आहेत. यावर्षी या भागातील ताडवाडी आणि बांगरवाडीमध्ये पिण्याचे पाणी देण्यासाठी टँकर सुरू केले आहेत. त्यासाठी संघटनेचे अध्यक्ष दिनकर बच्छाव, सचिव राजेश गायकवाड, नेरळचे उपसरपंच पप्पू शेळके, कोषाध्यक्ष भास्कर भोईर यांनी प्रत्यक्ष जाऊन टँकर सुरू केले. ठाणे येथील राजेश गायकवाड यांनी यासाठी पुढाकार घेतला आहेत. (वार्ताहर)