शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:43 IST

जीवितहानी नाही : विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण

अलिबाग : थळ येथील खतनिर्मिती करण्यात अग्रेसर असणाऱ्या आरसीएफ कंपनीच्या क्षेत्रातील महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या १०० केव्हीच्या उपकेंद्राला मंगळवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. आरसीएफच्या अग्निशमन यंत्रणेने ती तत्काळ विझवल्याने मोठा अनर्थ टळला. शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तेथील केबलसह अन्य साहित्य जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याच कारणामुळे अलिबाग तालुक्यातील वीजपुरवठा २१ मे आणि २२ मे रोजी खंडित झाला होता. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने दुसºया फिडरवरून विद्युत प्रवाह सुरू केल्याने २१ मे रोजी रात्री वीजप्रवाह तब्बल दीड तासांनी परत सुरू झाला होता.

महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे कर्मचारी बुधवारी दिवसभर फॉल्ट शोधत होते. मात्र, त्यांना तो सापडत नव्हता. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली व्हॅन अलिबागमध्ये दाखल झाल्यावर तिच्या माध्यमातून नेमका कोणता आणि कोठे फॉल्ट झाला होता याची माहिती मिळाली. त्यानंतर दुरुस्तीचे काम करण्यासाठी वीजप्रवाह पुन्हा दीड तासांसाठी खंडित करण्यात आला. अलिबाग तालुक्यातील थळ परिसरामध्ये आरसीएफचा खतनिर्मितीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार होणारी वीज महाराष्ट्र वीज कंपनीला देण्यात येते. यासाठी आरसीएफ प्रकल्पाच्या परिसरातच वीज कंपनीचे १०० केव्हीचे सबस्टेशन उभारण्यात आले आहे. आरसीएफ प्रकल्पातून तयार होणारी वीज या १०० केव्हीच्या सबस्टेशनच्या माध्यमातून वीज कंपनी अलिबागमध्ये पुरवठा करते. मंगळवारी याच सबस्टेशनला सायंकाळी शार्टसर्किटमुळे अचानक आग लागली होती. आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन यंत्रणेने ती तातडीने विझवली. सुदैवाने यामध्ये कोणतीच जीवितहानी झाली नसल्याचे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अलिबाग येथील उपअभियंता पंकज जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बुधवारी सायंकाळी फॉल्ट सापडल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी ४.४५ वाजता विद्युत प्रवाह पुन्हा खंडित करण्यात आला. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर सुमारे दीड तासानंतर विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मंगळवारी विद्युत पुरवठा १ ते ५ असा सलग खंडित झालाहोता.

व्यावसायिकांना फटकाकडक उन्हाचे चटके बसत असल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर पुन्हा विजेचा लंपडाव सुरूच असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले होते. मंगळवारी दुपारी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विविध व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला. बुधवारी दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा खंडित केल्याने नागरिकांना पुन्हा फटका बसल्याने वीज कंपनीबाबत नाराजी दिसून आली.

विद्युत पुरवठा खंडितच्कार्लेखिंड : सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे रेवस फिडरच्या हद्दीतील नागरिक हैराण झाले आहेत. रेवस फिडरच्या अखत्यारित मोठा विभाग असल्यामुळे जास्त अडचणी होत आहेत. दररोज काही ना काही तरी तांत्रिक बिघाड होत आहे.च्मे महिन्यातील उन्हाळा आणि त्यात वाढलेली उष्णता यामुळे घरात पंखा किंवा एसी लावल्याशिवाय माणसाला दिलासा मिळत नाही; परंतु या फिडरमधील वीजपुरवठा नेहमीच खंडित होत असतो कारण या विभागातील उच्चदाब वाहिनी ही जंगलातून तसेच झाडांमधून नेलेली आहे.च्दुसरे म्हणजे जीर्ण विद्युत तारा तर कर्मचारी आणि अभियंता यांचा तुटवडा या गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे बदलत्या काळानुसार विद्युत मंडळाने जमिनीखालून विद्युत वाहिन्या टाकून ग्राहकांना सुरळीत सेवा देण्याची गरज निर्माण झाली आहे.च्मंगळवारी सासवणे, आवास, तुडाळ येथे वाहिनी तुटली होती आणि थळ येथे जमिनीतून टाकण्यात आलेली उच्चदाब वाहिनी जळल्याने जवळजवळ सहा ते सात तास तर काही ठिकाणी १४ तास विद्युत पुरवठा खंडित झाला.