शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मच्छीमार बोटीला आग, १८ खलाशांचा वाचला जीव

By निखिल म्हात्रे | Updated: February 28, 2025 16:05 IST

बोट बाहेर काढण्यासाठी लागला सहा तासांचा काळ

अलिबाग - येथील खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या  बोटीला आग लागली. ९० टक्के बोट जळून खाक झाली असून या बोटमालकाचे १ कोटी ८० लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे बोटीत असलेल्या १८ खलाशांचा जीव वाचला आहे. बोट बाहेर काढण्यसाठी सहा तासांचा अधिक काळ लोटला होता. कोस्ट गार्डच्या मदतीने आग विझविण्यात आली.

शुक्रवारी पहाटे समुद्रातून मच्छीमारी करण्यासाठी एकवीरा माऊली हि बोट गेली होती, बोटीवरील खलाशी परतीचा प्रवास करीत होते. बोटीत अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग ईतकी भयावह होती की बोट पूर्ण जळून खाक झाली. बोटीला आग लागली असल्याचे कळताच आग विझविण्याचा प्रयत्न बोटीतील खलाशांनी केला होता. मात्र त्यांचे प्रयत्न असफल ठरले. आगीचे लोंढे वाढताना दिसातच बोलतील खलाशांनी समुद्रात उड्या घेतल्या व होडीतून किनार्‍यावर आले.

कोस्ट गार्डच्या मदतीने आग विझविण्यात आली मात्र बोटीतील जाळी, मच्छिमारासाठी लागणारे अवजारे जळून खाक झाली. समुद्रातील बोट किनार्‍यावर आणण्यासाठी एक एक करीत सर्व मच्छीमार बोट बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करू लागले होते. बोटीतील यंत्र सामुग्री निकामी झाली आहे. साधारण सहा तासांच्या अथक परीश्रमानंतर बोट बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आले.

पहाटेच्या सुमारास बोटीला आग लागल्याचे आम्हाला कळताच आम्ही दुसऱ्या बोटीने घटनास्थळी पोहोचलो. तो पर्यंत बोट पूर्ण जळून खाक झाली होती. बोटीचा पाया फक्त राहिला. या बोटीला खेचत जटेटीवर आणले. या दुर्घटनेमुळे आमचे १ कोटी ८० लाखाचे नुकसान झाले आहे. एकतर अगोदर आम्ही कर्ज बाजरी आहोत, त्यात पुन्हा आता आमच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.- राकेश गण, बोटीचे मालक.

पहाटे चारच्या सुमारास अचानक हा प्रसंग घडला आहे. त्यामधे आमच्या नाखवाची हानी झाली आहे. अनेकवेळा असे नुकसान होत असते, आमच्या मदतीला सरकार कधीच धाऊन येत नाही. आता तरी आमच्या या बांधवाला सरकारने आर्थिक मदतीचा हात पुढे करावा.- भगवान नाखवा, मच्छीमार. 

टॅग्स :alibaugअलिबागfireआग