शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

कणसांनी डोईभार झाले भातपीक

By admin | Published: September 12, 2016 3:23 AM

निसर्गचक्रातील बदल हे ठरलेले असतात. दिसमास पूर्ण झाल्यावर नव्याची नवलाई दाखविणे असताना हा निसर्गाचा गुणधर्म गौरी गणपती सणांचा आनंद

पेण : निसर्गचक्रातील बदल हे ठरलेले असतात. दिसमास पूर्ण झाल्यावर नव्याची नवलाई दाखविणे असताना हा निसर्गाचा गुणधर्म गौरी गणपती सणांचा आनंद उपभोगीत असताना देशाचा अन्नदाता बळीराजासुद्धा मनोमन आनंदी झाला. या आनंदाचे महत्त्वाचे कारण म्हणजे भातशेतीमध्ये कणस डोईभार झाली असून सध्या वाऱ्याच्या मंद झुळूकीबरोबर डोलू लागलीत. हलव्या प्रकारातील भात प्रजातीची ७० ते ९० टक्के दिवसांच्या कालावधीतील भाताला कणसं आली असून सध्या निपजलेल्या दाण्यामध्ये तांदूळ बनण्याची प्रक्रिया म्हणजे दूध भरणी सुरू आहे. जसजसा दाणा पक्व होईल तसतसा शिवाराचा हिरवा रंग सोनेरी रंगाचा पट्टा तयार होईल. अन्नपूर्णा शिवारावर प्रसन्न झाली असून विजयादशमीपर्यंत शिवारात सोने लुटायची प्रक्रिया सुरू होईल.शेतकरी बांधवांसाठी हवामानशास्त्र विभागाने गुड न्यूज दिली असून मान्सूनची परतीचा प्रवास सुरू होण्याची वेळ येवून ठेपली आहे. कोकण पट्ट्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली असून बहुतांशी आकश निरभ्र असेल. सध्या पहाटे पडणारं दव हे गर्भधारणा अवस्थेतील पिक व कणसांत दूध भरण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक औषधी मात्रा असल्याने पिकांवरील किडरोगांचे समूळ उच्चाटन करणारे आहेत. शिवारात पिकांचे ताटवे व माळरान गवतावर दवभार झालेल्या गवताच्या पाल्यावर मोत्यासारखे चमचमणारे दवबिंदू, दवांचा होणारा वर्षाव हा ऋ तू बदलनाच्या नैसर्गिक खुणा आहेत. येणारा नवरात्रोत्सवात आदिमायेच्या घटस्थापनेप्रसंगी शिवार धनधान्यांनी समृद्ध होणार आहे. यंदाचा मान्सून हंगाम पिकांसाठी शंभर टक्के अनुकूल झाल्याने वर्षा ऋ तूला निरोप देताना बाप्पाच्या अनंत चतुर्दशीनंतर, शिवारात लगबग वाढणार आहे.हलक्या जातीची भातपिकं परिपक्व झाल्यावर त्याची कापणी न मळणी (झोडणी) एकाचवेळी क रण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हिटसारखे ऊन पडत असल्याने प्रसवलेली कणसं, दाणा भरणी व रंगरूप पालटण्यास कमी वेळ घेतात. (वार्ताहर)