शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
2
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
3
सलमान खानमुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाली? सलीम खान म्हणाले, "त्याचा काही संबंध..."
4
दोन मुलांच्या मृतदेहांसह कुटुंब करत होतं धार्मिक विधी, शेजाऱ्यांनी बोलावले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
6
सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..."
7
₹१०००, २०००, ३००० किंवा ५००० टाकल्यास तुमच्या मुलीला किती रक्कम मिळेल; पाहा कॅलक्युलेशन
8
प्रसूतीसाठी डॉक्टर वेळेत न आल्याने मातेच्या पोटातच दगावले बाळ; २४ तास महिलेची तडफड, शस्त्रक्रियेनंतर मातेची सुटका
9
पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत
10
राज्यातील तब्बल ९ खासगी वैद्यकीय महाविद्यालये रडारवर; दोन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त; 8 दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश
11
छोट्या घटक पक्षांना हव्यात अधिक जागा; मविआ जागावाटपाचा विषय लांबला 
12
बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट 
13
युद्धाचा भडका; सोन्याचा भाव ७७ हजार ९०० रुपयांवर, जीएसटीसह किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या
14
सिद्दिकी हत्याकांड प्रकरण, पाच जणांना अटक
15
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
16
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
17
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
18
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
19
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
20
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?

किराणा, औषध विक्रेते निघाले गावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:26 AM

परप्रांतीय व्यावसायिकांचे स्थलांतर

नवी मुंबई : लॉकडाऊनचे नियम काहीसे शिथिल होताच किराणा आणि औषध विक्रेत्यांनीही गावचा रस्ता धरला आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये अविरत खुली असलेली औषध आणि किराणा विक्रीची अनेक भागोतील दुकाने बंद दिसत आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पर्यायी दुकानाचा शोध घ्यावा लागत आहे. पुढील दोन-तीन महिने गावी गेलेले विक्रेते परत येण्याची शक्यता नाही.

नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रात जवळपास ६५0 औषधाची दुकाने आहेत. तर किराणा मालाच्या दुकानांची संख्या पाच हजारांच्या घरात आहे. अत्यावश्यक औषधांसह दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांना स्थानिक स्तरावर असलेल्या याच दुकानांवर अवलंबून राहावे लागते. लॉकडाऊनच्या काळात गल्लीबोळात थाटलेल्या या दुकानांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. शहरात असलेल्या एकूण औषध विक्रीच्या दुकानांपैकी सरासरी ४0 टक्के दुकाने राजस्थानी चालवतात. तर किराणामालाच्या ९0 टक्के दुकानांची मालकी राजस्थानी व इतर प्रांतीय लोकांकडे आहे. दुकानातील कर्मचाऱ्यांनी अगोदरच स्थलांतर केले आहे. तर विक्रेत्यांनीही दुकाने बंद करून गावाचा रस्ता धरला आहे. परिणामी लॉकडाऊनमध्ये उपयुक्त ठरलेल्या विविध भागांतील औषध आणि किराणामालाच्या दुकानांना सध्या टाळे लागल्याचे दिसत आहे.मिशन बिगिन अगेन अंतर्गत सोमवारपासून शहरातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाल्याने शहराच्या बहुतांशी भागातील व्यवहार सुरू झाले आहेत. परंतु अनेक भागांतील मेडिकल्स आणि अन्नधान्याच्या विक्रीची दुकाने बंद असल्यानेस्थानिक रहिवाशांना खरेदीसाठी दूरच्या पर्यायाचा अवलंब करावा लागत आहे.दुकाने बंद करू नयेच्औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून मेडिकल्सची दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देेश राज्य सरकारने दिले. या काळात शक्यतो कोणीही दुकाने बंद ठेवू नये, असे संघटनेने आवाहन केले आहे. तरी काही विक्रेते दुकाने बंद करून गावी जात असतील तर त्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात, असे नवी मुंबई रिटेल केमिस्ट अ‍ॅण्ड होलसेलर्स असोसिएशनचे सचिव सुनील छाजेड यांनी स्पष्ट केले आहे.