शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

पोलादपूर तालुक्यामध्ये भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:52 IST

पुरवठा विभागाकडून ४५ प्रस्ताव मंजूर; १० गावे, ३५ वाड्यांना चार टँकरने पाणीपुरवठा

- प्रकाश कदम पोलादपूर : रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईने डोके वर काढण्यास सुरु वात केली आहे. पाणीटंचाईची भीषणता वाढल्याने पोलादपूर तालुक्यातील दहा गावे आणि ३५ वाड्यांना टंचाईची झळ बसत असल्याने नागरिकांची तहान भागवण्यासाठी उपाययोजना म्हणून प्रशासनाने चार टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. एकूण ६५ वाड्या व गावे यांचे प्रस्ताव पोलादपूर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे आले असून, ४५ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. चार टँकरने सुरळीत पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे.तापमान वाढल्याने तालुक्यातील नदीपात्र कोरडे झाले आहेत. ढवळी, कामथी, घोडवळी, सावित्री या मुख्य नद्या पावसाच्या हंगामात दुथडी भरून वाहत असतात, तर उन्हाळ्यात नद्यांची पात्र ओस पडत असल्याने, त्याचप्रमाणे साठवण टाक्या, कूपनलिका याची अवस्था असून नसल्यासारखी झाल्याने तालुक्यातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पाऊस पडतो. मात्र, पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. जिल्ह्यात मोठी धरणे निर्माण करण्यात सरकार आणि प्रशासनाला अपयश आले आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेल्या धरणांची योग्य ती डागडुजी करण्यात न आल्यानेही पाण्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे प्रलंबित धरणाचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे.टंचाईग्रस्त गाव-वाड्याचांभारगणी बु., ओंबळी तामसडे, गोळेगणी गावठाण, तुटवली, साडेकोंड, किनेश्वर गावठाण, कुंभळवने, कालवलीतील कापडे खुर्द राखेचाकोंड, परसुळे, किनेश्वरवाडी, ओंबळी धनगरवाडी, कुडपण शेलारवाडी आदींचा सामावेश आहे.महामार्गालगतच्या गावांमध्ये पाणीटंचाईमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामात काही विहिरी बाधित झाल्या असल्याने, त्याच विहिरींचे पुनर्वसन गावाजवळ किंवा मुख्य विहिरीच्या आसपास करणे गरजेचे आहे. महाड तालुक्यातील महामार्गालगत वसलेल्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, त्याचप्रमाणे किल्ले रायगडच्या पायथाशी असलेल्या गावांना पाणीटंचाई भासत असून, महिलांसह ग्रामस्थ दूरवरून पाणी आणत असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई