शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
2
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
3
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
4
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
5
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
6
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
7
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
8
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
9
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व
10
'बिग बॉस' मराठीचा महाअंतिम सोहळा आणि हिंदीचा ग्रँड प्रीमियर एकाच दिवशी, जाणून घ्या तारीख
11
जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
12
"ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  
13
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
14
IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी
15
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!
16
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
17
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
18
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
19
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
20
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं

उरणमध्ये भात कापणी अंतिम टप्प्यात; रानडुक्करांमुळे शेतीचे नुकसान,शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 5:34 PM

राज्यात सर्वत्र शेतीच्या कामांना वेग आला आहे.परंतु मजुरांअभावी शेतकरी चिंतेत सापडला आहे.

उरण : उरण तालुक्यात भात कापणीला  जोरदार सुरुवात झाली असून भात कापणी अंतिम टप्प्यात  आली आहे. मात्र तरीही अजून सर्वत्र शेतमजुरांची टंचाई भासत असल्याने  शेतकरी  चिंतातूर झाला आहे.

निसर्गचक्राचे बिघडलेले संतुलन आणि अवकाळी पडणारा पाऊस ही भीती शेतकऱ्यांच्या मनात आहेच. अशातच हातातोंडाशी आलेला घास हिरावूनजाऊ नये म्हणून शेतकऱ्यांची भात कापणीची धावपळ सुरू आहे. परंतु भात कापणीकरीता वेळीच मजूर मिळत नसल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.दरम्यान नाईलाजाने शेतकरी, आपल्याच कुटुंबातील नातेवाईकांच्या मदतीने शेतात भात कापणी करताना दिसत आहेत. उरण तालुक्यात चिरनेर विभागात अनेक ठिकाणी आदिवासी मजुरांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

एकेकाळी भात कापणी झाल्यानंतर पिकाची कडवे चार दिवस चांगली वाळल्यानंतरच त्याचे भारे बांधून उडव्यात  रचून ठेवले जात असत. त्यानंतर शेतातच खळा  तयार करून त्याचे व्यवस्थित शेणाने सारवण करून त्यानंतरच त्या खळ्यावर मळणीची प्रक्रिया केली जात होती.

 परंतु सध्याच्या लहरी पावसाच्या भीतीने वर्षभर केलेले  कष्ट व त्यासाठी केलेला अमाप खर्च वाया जाऊ नये म्हणून शेतकरी पिके न वाळवताच आणि त्याची साठवणूक न करताच ताबडतोब कापलेले भात पीक  झोडून भात घरी आणत आहेत. उरण तालुका भाताचे कोठार समजले जात होते. परंतु मागील काही वर्षापासून शेती व शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून नुकसान होत असल्याने, तसेच येथील औद्योगीकरणामुळे शेतीतील उत्पादनावर हमखास गदा येताना दिसत आहे. पूर्वी इतके भाताचे शेतीतून विक्रमी उत्पादन होत नाही .

भातशेती ही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना कधी ओला दुष्काळ तर कधी सुक्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी जमिनी लागवडी खाली न आणता त्या ओसाड ठेवल्या जात आहेत. त्यामुळे या भागात शेतीकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. ज्या मूठभर शेतकऱ्यांनी भातशेतीची लागवड केली आहे. अशाही शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल  झाला आहे. त्यातच जंगल भागात असणाऱ्या भात शेतीवर रानडुकरांची वक्रदृष्टी वळली असल्याने, भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास कळपाने पिकावर हल्ला करणारी रानडुकरे हिरावून नेत असल्याने, रानडुकरांचा वनविभागाकडून, बंदोबस्त करावा अशी मागणीही उरण परिसरातील शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरणFarmerशेतकरी