शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

ठेकेदारीला ‘सर्वोच्च’ दणका, हातरिक्षा चालकांनाच ‘ई रिक्षा’, श्रमिक रिक्षा संघटनेच्या मागणीला मिळाले यश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 09:24 IST

पायलट प्रकल्पानंतर बंद केलेली माथेरानमधील ई रिक्षा सेवा पुन्हा सुरू करावी व या रिक्षा हातरिक्षा चालकांना चालवायला द्याव्यात, ही श्रमिक रिक्षा संघटनेची मागणी होती.

माथेरान : अमानवीय प्रथेतून सुटका व्हावी, यासाठी ई रिक्षा हातरिक्षा चालकांना द्याव्यात ही मूळ मागणी असताना सेवा देताना त्यांना डावलण्यात आले होते. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. याची सुनावणी नुकतीच झाली असून, न्यायालयाने ई रिक्षा या हातरिक्षा चालकांनाच चालवायला द्याव्यात, असे आदेश दिले आहेत. 

पायलट प्रकल्पानंतर बंद केलेली माथेरानमधील ई रिक्षा सेवा पुन्हा सुरू करावी व या रिक्षा हातरिक्षा चालकांना चालवायला द्याव्यात, ही श्रमिक रिक्षा संघटनेची मागणी होती. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात पायलट प्रोजेक्टबाबत माहिती घेत न्यायालयाने ई रिक्षांचा हा पायलट प्रकल्प पुढील आदेश येईपर्यंत सुरू ठेवावा, असे आदेश दिले. त्यानुसार माथेरान नगर परिषदेने ही बंद असलेली सेवा सुरू केली. मात्र, ती हातरिक्षा चालकांना न देता ठेकेदारांमार्फत चालवली. यामुळे हातरिक्षा चालकांनी संताप व्यक्त करीत न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्यानुसार  सर्वोच्च न्यायालयात ॲड. सिंघवी यांनी न्यायाधीश बी.आर. गवई यांच्यासमोर हातरिक्षा चालकांची बाजू मांडली.

न्यायालयाने या ई रिक्षा फक्त हातरिक्षा चालक यांनाच चालवायला द्याव्यात, असे आदेश देताना हॉटेल व रिसॉर्ट मालक यांना देण्यात येऊ नयेत, अशी पुष्टी जोडली आहे. तसेच या ई रिक्षा मर्यादित स्वरूपातच राहिल्या पाहिजेत, असेही आदेश देण्यात आले आहेत. 

पेव्हर ब्लॉकबाबत मुदतवाढ घोडेवाल्यांनी १० जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत माथेरान नगर परिषदेतर्फे बनविण्यात येत असलेल्या पेव्हर ब्लॉक रस्त्यांबाबत ४२ पानांचे आक्षेप नोंदविले. हे ब्लॉक्स केवळ ई रिक्षासाठी बसविल्याचा आरोप त्यांचे ॲड. श्याम दिवाण यांनी केला. यावर माथेरान नगरपालिकेने ब्लॉक्सचे हे काम २०१४ पासून सनियंत्रण समितीने मातीची धूप थांबविण्यासाठी सुरू केले आहे. त्यावेळी ई-रिक्षा येथे उपलब्धदेखील नव्हत्या. आयआयटी पवई या संस्थेचे मातीच्या पेव्हर ब्लॉक्सबाबतचे अहवाल न्यायालयात सादर करायचे असल्याने त्यांनी एक महिन्याची मुदत वाढवून मागितली. ती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी ई रिक्षा फक्त हातरिक्षा चालकांना देण्यात याव्यात, असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे ठेकेदार रद्द करून परवानाधारक रिक्षा चालकांना त्या देण्यात याव्यात. हातरिक्षा चालकांनी ई रिक्षाचे प्रशिक्षणदेखील घेतले आहे.    - शकील पटेल, अध्यक्ष,     श्रमिक रिक्षा संघटना, माथेरान

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत अद्याप माथेरान नगरपरिषदेला प्राप्त झाली नाही. प्रत प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.- राहुल इंगळे, प्रशासक तथा मुख्याधिकारी, माथेरान नगरपरिषद

टॅग्स :Karjatकर्जत