शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील शेकडो गावे अजूनही अंधारात, काम थंडावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 00:31 IST

कोरोना प्रादुर्भाव, कमी पडत असलेले मनुष्यबळ, वीज पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ते साहित्य आणि पावसाचे दिवस यामुळे व्यत्यय येत असल्याचे सांगितले जाते.

म्हसळा : निसर्ग चक्रीवादळातून विजेचे वीजप्रवाह खांबसुद्धा सुटले नाहीत. यामुळे सगळीकडे अंधार पडला आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी वीज वितरण कार्यकारी अभियंता रघुनाथ माने, सहा.अभियंता खांडेकर आणि त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीने म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यात कोलमडलेली वीज वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत होईल, असे प्रयत्न केले आहेत, पण कोरोना प्रादुर्भाव, कमी पडत असलेले मनुष्यबळ, वीज पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ते साहित्य आणि पावसाचे दिवस यामुळे व्यत्यय येत असल्याचे सांगितले जाते.तालुका शहरे वगळली, तर गेली महिनाभरात शेकड्यांनी गावे अंधारात आहेत. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे काम आणि सांगण्यात येत असलेली कारणे अशीच सुरू राहिले, तर खेडेगावात महिना दोन महिने नव्हे, वर्ष, दोन वर्षे वीजपुरवठा खंडित राहील, असे वीज वितरण कंपनीतल कर्मचारी लोकांना सांगत आहेत.शासन स्तरावर वीजपुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. मुख्यकरून ताप, सर्दी, खोकल्याची साथ आणि कोरोनाची भीती असे असताना, वैद्यकीय गरज लागली, तर सेवा मिळवायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज नसल्याने फोन चार्ज होत नाहीत, नळपाणीपुरवठा योजनेला पाणी येत नाही. गावांमध्ये नेटवर्क नसल्याने डॉक्टर, नर्स कोणालाही फोन करता येत नसल्याचे चित्र आहे. केवळ शहरी भागातील काही ठिकाणी विजेचा पुरवठा झाल्यानंतर, खेडेगावातही उशिरा का होईना, विजेची व्यवस्था व्हायला पाहिजे आहे, ती महिना उलटला तरी होताना दिसत नाही. अखेरीस कंटाळून अनेक गावांतील चाकरमानी कुटुंबे बायका-मुले घेऊन परत मुंबई, पुणे आधी शहरात निघून गेले आहेत.१२ जुलैपर्यंत हीच स्थितीवादळामुळे तब्बल १५ हजार विजेचे खांब पडले होते. विजेच्या तारा, वीज जनित्रे यांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. सुरुवातीला तब्बल १,९०६ गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर, महावितरणने युद्ध पातळीवर काम करून वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. अद्याप माणगाव, म्हसळा, रोहा आणि श्रीवर्धन तालुक्यातील १९० गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे महावितरणेचे प्रयत्न सुरू आहेत. ५ जुलैपर्यंत माणगाव, म्हसळा, रोहा तर श्रीवर्धन तालुक्यात १२ जुलैपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होणार असल्याने अद्यापही गावे अंधारामध्ये चाचपडत आहेत.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण